खाद्यतेलाचा पुनर्वापर केला तर कारवाई अटळ

मुंबई (प्रतिनिधी) : अन्नपदार्थ तळण्यासाठी खाद्यतेलाचा जास्तीत जास्त २ वेळा वापर करुन संपवावे. जर ते पुन्हा तळण्यासाठी वापरले, तर त्यातील पोलर कंपाउंडचे व ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढून ते आरोग्यावर विपरित परिणाम करते. अन्न पदार्थ तळण्यासाठी खाद्यतेलाचा पुर्नवापर केला तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.


अन्न पदार्थ तळण्यासाठी खाद्यतेलाचा पुर्नवापर केला तर त्यामुळे कर्करोग, हृदयविकार व पचनासंबंधी आजार होण्याचा धोका संभव आहे. खाद्यपदार्थ तळण्यासाठी लोखंडी कढई न वापरता स्टिल कढई वापरावी. शक्यतो वनस्पती तेलाचा वापर करावा, खाद्य पदार्थ तळताना अन्न कणे काळपट होण्यापूर्वीच काढून टाकावीत, असे अन्न व औषध प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. जे अन्न व्यावसायिक नियमांचा भंग करुन खाद्यतेलाचा वारंवार वापर करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायदा २००६, नियम व नियमन २०११ अन्वये कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देऊन याची सर्व अन्न व्यवसायिकांनी नोंद घेण्याचे बजावण्यात आले आहे.


दररोज ५० लिटरपेक्षा अधिक तेलाचा वापर करीत असलेल्या व्यवसायिकांनी साठ्याबाबत नोंद ठेवणे बंधनकारक आहे. असे पुनर्वापर करण्यात आलेले व साठवून ठेवलेले खाद्यतेल केंद्रीय अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण नवी दिल्ली यांची मान्यता असलेल्या बायोडिझेल उत्पादक कंपनी आणि त्यांचे स्थानिक प्रतिनिधी यांना देणे बंधनकारक आहे. सदर पुनर्वापर केलेल्या खाण्यास अयोग्य असल्याने खाद्यतेल बायोडिझेल उत्पादक सदर कंपनीमार्फत अन्न उत्पादक व्यवसायिकांचे शासन नियमाप्रमाणे सदर खर्चाची रक्कम देण्यात येईल.


मुंबई शहरासाठी मे. E RISK BIO ENERGY यांची स्थानिक प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा दुरध्वनी क्रमांक ९८९२०५४७२५ असा आहे. तसेच वापरुन किती तेल शिल्लक राहिले आहे व तेलाची विल्हेवाट कशी लावली, किंवा शिल्लक तेल हे कोणत्या नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादकाला दिले, या संबंधिची नोंदवही ठेवणे आवश्यक आहे.


याबाबतीत बृहन्मुंबई विभागात ३३ अन्न व्यावसायीकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई नियमित सुरु राहणार असून याची हॉटेल, रेस्टॉरन्टस, फरसाण उत्पादक अन्न व्यावसायीकांनी नोंद घ्यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्तांनी हे परिपत्रका जारी केले आहे.

Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित