कर्नाटकात भीषण अपघातात ७ ठार २६ जखमी

हुबळी (हिं.स.) : कर्नाटकमध्ये हुबळी धारवाडच्या तरीहाळा बायपासवर लॉरी आणि खासगी बसची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २६ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना हुबळीच्या क्रिम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार कोल्हापूरहून बंगळूरकडे जाणाऱ्या खासगी बस आणि लॉरीची आमने-सामने जोरदार धडक झाली. सोमवारी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात घडला आहे. बसचा ड्रायव्हर एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे.


समोरा-समोर टक्कर होऊन झालेल्या या भीषण अपघातात बसमधील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये कर्नाटकच्या दोघांचा तर महाराष्ट्रातील कोल्हापूर व पुणे येथील पाच जणांचा समावेश आहे.


पोलिसांनी या अपघाताबाबत गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. हा अपघात इतका भीषण होता की बसच्या समोरील भागाचा पूर्णत: चेंदामेंदा झाला आहे. गेल्या काही दिवसात कर्नाटकमध्ये रस्ते अपघातांत वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच धारवाडमध्येही अपघाताची घटना घडली होती. त्यात ७ जण ठार झाले होते. ही घटना ताजी असताना खासगी बसच्या भीषण अपघाताची घटना घडली.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.