कर्नाटकात भीषण अपघातात ७ ठार २६ जखमी

  90

हुबळी (हिं.स.) : कर्नाटकमध्ये हुबळी धारवाडच्या तरीहाळा बायपासवर लॉरी आणि खासगी बसची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २६ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना हुबळीच्या क्रिम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार कोल्हापूरहून बंगळूरकडे जाणाऱ्या खासगी बस आणि लॉरीची आमने-सामने जोरदार धडक झाली. सोमवारी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात घडला आहे. बसचा ड्रायव्हर एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे.


समोरा-समोर टक्कर होऊन झालेल्या या भीषण अपघातात बसमधील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये कर्नाटकच्या दोघांचा तर महाराष्ट्रातील कोल्हापूर व पुणे येथील पाच जणांचा समावेश आहे.


पोलिसांनी या अपघाताबाबत गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. हा अपघात इतका भीषण होता की बसच्या समोरील भागाचा पूर्णत: चेंदामेंदा झाला आहे. गेल्या काही दिवसात कर्नाटकमध्ये रस्ते अपघातांत वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच धारवाडमध्येही अपघाताची घटना घडली होती. त्यात ७ जण ठार झाले होते. ही घटना ताजी असताना खासगी बसच्या भीषण अपघाताची घटना घडली.

Comments
Add Comment

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध

रशियाकडून तेल खरेदी करत भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा

नवी दिल्ली: रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या विरोधात

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी