नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरपचा मोठा साठा जप्त

  69

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई नार्कोटिक कन्ट्रोल ब्युरो विभागाने भिवंडी परिसरात मोठी कारवाई करीत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपचा साठा जप्त केला आहे. या सर्व साठ्याची किंमत ३५ लाख इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. एनसीबीकडून सातत्याने अमली पदार्थ विरोधात कारवाया सुरूच आहेत. मुंबईतील भिवंडीच्या आग्रा-मुंबई महामार्गावरील परिसरात शनिवारी (दि. २१) रोजी ही धडक कारवाई करण्यात आली.


एनसीबीच्या मुंबई युनिटने भिवंडी परिसरातून ८६४० नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपच्या बाटल्या जप्त केला आहेत. अचानक इतका मोठा साठा येथे कसा मिळाला, असा सवालही यामुळे उपस्थित होत आहे. यासंदर्भातील अधिकचा तपास एनसीबीने सुरू केला आहे. एनसीबीकडून याबाबतची माहिती देण्यात आली.


याप्रकरणी एनसीबी मुंबई युनिटने दोघांना अटक केली आहे. भिवंडीच्या आग्रा-मुंबई महामार्गावर हा साठा एका गाडीतून येणार असल्याची माहिती एनसीबीला आधी मिळाली होती. त्यानुसार एका संशयित बोलेरो पिकअपची एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली.


या संशयित वाहनातील ६० बॉक्समध्ये एकूण ८६४ किलो ८६४० कोडीन आधारित कफ सिरप भरलेले आढळले आहे. जप्त केलेल्या या मालमत्तेची एकूण किंमत ३५ लाख रुपये आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एनसीबी अधिकरी या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही