नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरपचा मोठा साठा जप्त

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई नार्कोटिक कन्ट्रोल ब्युरो विभागाने भिवंडी परिसरात मोठी कारवाई करीत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपचा साठा जप्त केला आहे. या सर्व साठ्याची किंमत ३५ लाख इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. एनसीबीकडून सातत्याने अमली पदार्थ विरोधात कारवाया सुरूच आहेत. मुंबईतील भिवंडीच्या आग्रा-मुंबई महामार्गावरील परिसरात शनिवारी (दि. २१) रोजी ही धडक कारवाई करण्यात आली.


एनसीबीच्या मुंबई युनिटने भिवंडी परिसरातून ८६४० नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपच्या बाटल्या जप्त केला आहेत. अचानक इतका मोठा साठा येथे कसा मिळाला, असा सवालही यामुळे उपस्थित होत आहे. यासंदर्भातील अधिकचा तपास एनसीबीने सुरू केला आहे. एनसीबीकडून याबाबतची माहिती देण्यात आली.


याप्रकरणी एनसीबी मुंबई युनिटने दोघांना अटक केली आहे. भिवंडीच्या आग्रा-मुंबई महामार्गावर हा साठा एका गाडीतून येणार असल्याची माहिती एनसीबीला आधी मिळाली होती. त्यानुसार एका संशयित बोलेरो पिकअपची एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली.


या संशयित वाहनातील ६० बॉक्समध्ये एकूण ८६४ किलो ८६४० कोडीन आधारित कफ सिरप भरलेले आढळले आहे. जप्त केलेल्या या मालमत्तेची एकूण किंमत ३५ लाख रुपये आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एनसीबी अधिकरी या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील