डॉ. मिलिंद घारपुरे
सकाळी सकाळी ऑफिस बॅगेची चेन खराब. सहा महिन्यांपूर्वी घेतलेली. वैतागत शोधत निघालो. एकही दिसेना. शेवटी सापडला एकदाचा.
छोट्या खोपटात एक दुकान. मशीनवर फाटकी बॅग शिवत असलेला आणि तितकाच फाटका दिसणारा ढीगाऱ्यात लपलेला माणूस. बॅग दाखवली. आता तीन-चारशेला तरी फटका. मी मनातल्या मनात… “चेन खराब झालीय जरा बदलता का?” मी.
चेन बघत… “साहेब कशाला बदलता, चांगली आहे. फक्त पिन खराब आहे, बसा दहा मिनिटं” तो.
“किती झाले”
“पंचवीस”
तीन-चारशे रुपये खर्च करायची मानसिक तयारी झालेली अडचणीतला मी, ते पंचवीस रुपये देताना उगाचच चुकल्याचुकल्यासारखं वाटलं.
दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ. एका ठिकाणी व्हिजिट. फक्त दहा मिनिटांचे काम. परत आलो, कारला भला मोठा जॅमर. ‘हट साला!’ नो पार्किंग न बघता गाडी लावलेली…
आरटीओ आता एकदम प्रोफेशनल. कार हँडलमध्ये छान फोन नंबर, नाव टाइप केलेली चिट. फोन केला. पांढऱ्या खाकी कपड्यातले ट्रॅफिक हवालदार साहेब. काय शिकले-सवरलेले माणसं तुम्ही, बोर्ड बघत नाही का? वगैरे चार शब्द मुकाटपणे ऐकले. आता पाचशे रुपयाला तरी नक्की फटका. बघू दोन एकशेमध्ये ऐकतोय का?? मी मनातल्या मनात.त्याने बिल पावती काढली. बोलता-बोलता त्याला कळलं मी डॉक्टर आहे.
“किती झाले”… मी.
“तसे तीनशे होतात साहेब. पण राहू द्या. एखाद्या पेशंटला तेवढी औषधे कमी द्या आणि जरा बोर्ड बघून गाडी लावा”…. आणि तो गेला.
परत एकदा तेच फिलिंग, चूकल्याचुकल्यासारखं…
अखिल जगतात, कोणताही आणि कोणाचाही अर्थार्जनाचा व्यवसाय हा एक तर तुमची अडचण, समस्या सोडवणारा असतो किंवा तुमच्या शारीरिक मानसिक गरजेची पूर्तता तरी करणारा असतो. (टाटा, बिर्ला, अंबानींपासून कोपऱ्यावरच्या शहाळे, चहावाल्यापर्यंत) समोरच्याची समस्या, गरज हेच आपल्या कमाईचे साधन समजून स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्यांच्या या जगात, असे “अर्थहीन” अनुभव अमूल्यच!!
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…