हापूस पोहोचला थेट बायडन सायबांच्या दारी

  87

पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील फळ उत्पादक शेतकऱ्यांचे दर्जेदार आंबे सातासमुद्रापार म्हणजे अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पाठविण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी झाल्यामुळे भारतातून अमेरिकेत होणारी आंब्याची निर्यात यावर्षी पुन्हा सुरू झाली आहे. या आठवड्यात वॉशिंग्टन येथील आंबा विक्री प्रदर्शनात विविध प्रकारचे आंबे असलेली पेटी थेट राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना पाठविण्यात आली.


कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून आंबा निर्यात ठप्प होती. मात्र, आता आंब्याची निर्यात पुन्हा सुरू झाल्याने अमेरिकेत केशरपेक्षा हापूसला चांगली मागणी आहे. ‘रेनबो इंटरनॅशनल’ ही पुण्याची आंबा निर्यातदार कंपनी अमेरिकेत पाच प्रकारचे आंबे निर्यात करते. त्यामध्ये महाराष्ट्रातील केसर, हापूस, गोवा मानकूर, आंध्र प्रदेशातील हिमायत आणि बांगनपाली यांचा समावेश असून हे आंबे अमेरिकेला पाठविण्यात आले आहेत.


रेनबो इंटरनॅशनल ही बारामती येथील कंपनी असल्याने बारामतीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करत याबाबत आनंद व्यक्त केला. बारामतीतील जळोची येथे रेनबो इंटरनॅशनलने पाठवलेला आंबा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे. अमेरिकन राष्ट्रपतींना पाठवलेल्या आंब्यांमध्ये हापूस, केशर आणि गोव्यातील मानकूर आंब्याचा समावेश आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक