नव्या प्रभाग रचना अंतिम करण्याच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा

  24

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने सुरू केलेली नव्या प्रभाग रचना अंतिम करणार की नव्याने हरकती आणि सुचना मागविणार, असा सवाल गुरुवारी उच्च न्यायालयाने उपस्थित केला. याबाबत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.


सर्वोच्च न्यायालयाने १० मे रोजी राज्यातील १२ पालिकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगांना दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व पालिकांना १५ मेपर्यंत प्रभागाची परिसीमा निश्चित करण्याचे आदेश देणारे परिपत्रकही जारी केले. त्यानुसार नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण डोंबिवली, बृहन्मुंबई आणि ठाणे आयुक्तांना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रमही निश्चित केला. या परिपत्रकाला पुण्यातील उज्ज्वल केसकर आणि प्रवीण शिंदे यांच्यासह अन्य याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर न्या. नितीन सांबरे आणि न्या. अनिल पानसरे यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक प्रकिया सुरू करण्यात आली आहे. तसेच या निवडणुकांसदर्भात सविस्तर माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर केली असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने अॅड. सचिंद्र शेट्ये यांनी खंडपीठाला दिली. त्यावर आक्षेप नोंदवत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निवडणुका घेण्यास आमचा विरोध नाही. मात्र, नव्या प्रभाग रचना अंतिम करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आमचा आक्षेप आहे.


तसेच आयोगाने सुचविलेल्या हरकती आणि सुचनांवर आलेल्या आक्षेपांवर सुनावणी घेण्यासाठी स्थापन केलेल्या चोकलिंगम समिती आक्षेपासंदर्भात तयार केलेला अहवाल निवडणूक आयोगाला सुपूर्द केला आहे. तो अहवाल सार्वजनिक करण्याचे आयोगाला आदेश द्या, अशी विनंती याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाच्या नव्या प्रभाग रचना अंतिम करण्याच्या निर्णयावर राज्य सरकारची नेमकी भूमिका काय आहे?, असा सवाल उपस्थित करत खंडपीठाने राज्य सरकारला त्याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आणि सुनावणी पुढील आठवड्यात निश्चित केली.

Comments
Add Comment

Kolhapuri Chappal Controversy : प्राडाच्या फॅशन रॅम्पवर कोल्हापुरी चप्पलचा रुबाब! तर, इटालियन 'प्राडा'वर चोरीचा आरोप... काय आहे नेमकं प्रकरण?

'भारताला श्रेय नाही'... नेटिझन्स पेटले मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इटलीच्या एका फॅशन शोची जबरदस्त चर्चा

कुर्ला ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास आता  वेगाने होणार...

मुंबई : मुंबईकरांची  वाहतूक कोंडी (TRAFFIC CONGESTION) सोडवण्यासाठी "एमएमआरडीए"ने नवीन प्रकल्प उभारण्याचं काम सुरु केले आहे. 

Hide Tide Alert: विक्रमी पावसानंतर मुंबईत भरतीचा इशारा, मुंबईच्या चौपाट्यांवर न जाण्याचे आवाहन

आज समुद्र खवळणार मुंबईत हाय टाइड अलर्ट जारी जूनच्या अखेरीस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान

Bus Strike : 'पालकांनो लक्ष द्या', मुलांच्या शाळेची बस न येण्याची शक्यता! विविध मागण्यांसाठी खाजगी बस चालकांचा १ जुलैपासून बेमुदत संप

स्कूल बस सेवांवरही होणार परिणाम मुंबई : मुंबईतील खाजगी बस चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर

‘१०० मिमीपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा आराखडा तयार करा’

केंद्र सरकारकडून मुंबईला स्वतंत्र निधी मिळणार मुंबई : मुंबईची सध्याची पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ५५

अखेर कर्नाक पुलाला आता लोकार्पणाची प्रतीक्षा

बुधवारी रात्री उशिरापर्यंत पूल विभागाने फिरवला शेवटचा हात मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर