हिंसक वातावरण निर्माण करणाऱ्या शक्तींविरोधात भूमिका घेण्याची वेळ: माधव भंडारी

पनवेल (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीच्या उन्मादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना वेठीस धरून सुरू केलेल्या गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आला आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी करून विषारी आणि हिंसक वातावरण निर्माण करणाऱ्या शक्तींविरोधात भूमिका घेण्याची वेळ जनतेवर आली आहे, असे पनवेल येथे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटले आहे.


पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेस भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत जुमलेदार आदी उपस्थित होते.


महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गुंडगिरीची भाषा केली जात आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शोधा आणि फोडा, असे आवाहन कार्यकर्त्याना केले गेले. हे उघड्या डोळ्याने दिसत असतानाही महाविकास आघाडीचे शरद पवार यांच्या मूक संमतीनेच मविआ सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला आहे की काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


अंतर्गत सत्तासंघर्षातून आलेल्या वैफल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन चालविलेला धुडगूस आणि दहशतवाद तातडीने थांबवून कायद्याला त्याचे काम करू द्यावे, असा सल्लाही माधव भंडारी यांनी दिला. गुंडगिरी आणि दहशतवाद माजविणाऱ्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याच्या सूचना राज्याच्या गृहखात्याकडूनच पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांचे हात बांधले गेले आहेत, असा आरोप करून, संयमी राजकारण करणारे पवार यांचे मौन त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली. सत्ताधारी पुरस्कृत दहशतवादामुळे राज्यात अशांतता माजली असून विरोधकांना दहशतीच्या मार्गाने संपविण्याचा कुटिल डाव सत्ताधारी पक्षाने आखला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

फलटण महिला डॉक्टर प्रकरण, हॉटेल रूममधल्या 'त्या' शेवटच्या क्षणांचं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; डॉक्टरच्या आत्महत्येमागे नेमकं काय घडलं?

फलटण : महाराष्ट्रातील फलटण शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्यात

पोलिसांनी तरुणीसह आरोपींच्या फोनचे CDR काढले, हाती आली 'ही' माहिती

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचा तपास पोलीस करत

कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक

सोलापूर: वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी महत्त्वाची असते. याच पंढरपूरच्या कार्तिकी

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या