'...म्हणून धर्मवीर चित्रपटाचा शेवट उद्धव ठाकरेंनी पाहिला नाही'

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे लोकप्रिय नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर हा चित्रपट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच पाहिला. पण चित्रपटाचा शेवट पाहणे त्यांनी टाळले. या संदर्भात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक ट्वीट शेअर केले आहे. 'दुःखद शेवट पाहू शकणार नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी चित्रपटाचा शेवट पाहणे टाळले? असं समजू नका.


चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री राणे साहेबांची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांनी शेवट पाहिला नाही. यावरून हे देखील कळते की, शिवसेनेच्या उभारणीत उद्धव ठाकरे हे नव्हते. सत्य नेहमीच बोचरे असते', असे ट्वीट नितेश राणे यांनी शेअर केले आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणे टाळले. याचे कारण देखील त्यांनी सांगितले होते. ते म्हणाले, 'मी चित्रपटाचा शेवट पाहू शकलो नाही. आनंद दिघे यांच्या अपघातानंतर मी व्यतिथ झालेले बाळासाहेब पाहिले आहेत. आनंद दिघे यांचा मृत्यू शिवसैनिकांवर आघात होता,' असे मुख्यमंत्री म्हणाले होते. प्रवीण तरडे यांनी धर्मवीर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Comments
Add Comment

प्रारुप मतदार यादीबाबत १०,६६८ तक्रारींचे निवारण

कंट्रोल चार्टद्वारे मतदार यादीची केली जाते पडताळणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता