'...म्हणून धर्मवीर चित्रपटाचा शेवट उद्धव ठाकरेंनी पाहिला नाही'

  82

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे लोकप्रिय नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर हा चित्रपट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच पाहिला. पण चित्रपटाचा शेवट पाहणे त्यांनी टाळले. या संदर्भात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक ट्वीट शेअर केले आहे. 'दुःखद शेवट पाहू शकणार नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी चित्रपटाचा शेवट पाहणे टाळले? असं समजू नका.


चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री राणे साहेबांची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांनी शेवट पाहिला नाही. यावरून हे देखील कळते की, शिवसेनेच्या उभारणीत उद्धव ठाकरे हे नव्हते. सत्य नेहमीच बोचरे असते', असे ट्वीट नितेश राणे यांनी शेअर केले आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणे टाळले. याचे कारण देखील त्यांनी सांगितले होते. ते म्हणाले, 'मी चित्रपटाचा शेवट पाहू शकलो नाही. आनंद दिघे यांच्या अपघातानंतर मी व्यतिथ झालेले बाळासाहेब पाहिले आहेत. आनंद दिघे यांचा मृत्यू शिवसैनिकांवर आघात होता,' असे मुख्यमंत्री म्हणाले होते. प्रवीण तरडे यांनी धर्मवीर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ९ महत्वाचे निर्णय !

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या

न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ, जरांगे मुंबईत येणार की नाही येणार लवकरच ठरणार

मुंबई : फडणवीस सरकारच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात झाली. उपसमितीचे

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील

'दिवेआगरच्या सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकर सुरू करा'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालय उभारण्याची योजना

मुंबई : मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मौजे सौंदाळे, जामसंडे येथे शासकीय

'नांदेड-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार'

मुंबई : मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे नांदेड शहर