Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीलोकायुक्त कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा - अण्णा हजारे

लोकायुक्त कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा – अण्णा हजारे

अहमदनगर (हिं.स.) : लोकायुक्त कायदा बनविण्याचे लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र, अडीच वर्षे उलटून देखील त्यावर काहीच होत नाही, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. यावरून हजारे यांनी एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा, असा इशारा हजारे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

माध्यमांशी बोलताना हजारे म्हणाले की, लोकायुक्त कायदा तयार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सत्ता कार्यकाळात आश्वासन दिले होते. फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार पायउतार झाल्यानंतर सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारने देखील लोकायुक्त कायदा तयार करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने लेखी आश्वासनही दिले होते. लोकायुक्त कायद्याच्या अनुषंगाने सात बैठकाही पार पडल्या होत्या. आता दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर बोलण्यास तयार नाहीत.

मुख्यमंत्री यावर बोलायला तयार नाहीत. नेमके काय झाले हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मोठे जनआंदोलन करण्याची गरज आहे, असे म्हणत हजारे यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांत आमची कमिटी तयार झाली असल्याची माहितीही अण्णांनी दिली.

केजरीवाल यांनीही लोकायुक्त कायदा केला नाही!

दरम्यान आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची दोन राज्यांत सत्ता आली. पण त्या राज्यांत लोकायुक्त कायदा तयार करण्यात आला नाही, याचे दु:ख वाटत असल्याचेही हजारे यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -