बाळासाहेबांचा मुलगा सीएम...पण आनंद दिघेंच्या… घरात नगरसेवकही नाही

  95

मुंबई (प्रतिनिधी) : ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना आता उजाळा मिळत आहे. ‘धर्मवीर’ हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारीत आहे.


हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी टाकलेली पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. ‘बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, ‘शिष्य’ एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुखही नाही; पण निवडणूक आली की दिघे साहेब.


आज दिघे साहेबांवर आधारित ‘धर्मवीर’ नावाचा चित्रपट रिलीज झाला; पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही’, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे. आनंद दिघे यांचे कुटुंब राजकारणात सक्रिय नाही, असे निलेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चर्चेचा विषय ठरली आहे.


https://twitter.com/meNeeleshNRane/status/1525061245535068160

या चित्रपटाचा खास शो ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये शुक्रवारी पार पडला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल आणि लेझीम पथकाच्या तालास्वरात, मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या कटआउटसमोर विधिवत पूजा करित दुग्धाभिषेकही करण्यात आला.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

मुंबई: गुजरातमधील जुनागड येथील गिरनार पर्वताच्या पाचव्या भागात श्री दत्तात्रेय भगवान यांचे तपश्चर्या स्थान

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात