मुंबई (प्रतिनिधी) : ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना आता उजाळा मिळत आहे. ‘धर्मवीर’ हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारीत आहे.
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी टाकलेली पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. ‘बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, ‘शिष्य’ एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुखही नाही; पण निवडणूक आली की दिघे साहेब.
आज दिघे साहेबांवर आधारित ‘धर्मवीर’ नावाचा चित्रपट रिलीज झाला; पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही’, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे. आनंद दिघे यांचे कुटुंब राजकारणात सक्रिय नाही, असे निलेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चर्चेचा विषय ठरली आहे.
या चित्रपटाचा खास शो ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये शुक्रवारी पार पडला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल आणि लेझीम पथकाच्या तालास्वरात, मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या कटआउटसमोर विधिवत पूजा करित दुग्धाभिषेकही करण्यात आला.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…