बाळासाहेबांचा मुलगा सीएम...पण आनंद दिघेंच्या… घरात नगरसेवकही नाही

मुंबई (प्रतिनिधी) : ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना आता उजाळा मिळत आहे. ‘धर्मवीर’ हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारीत आहे.


हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी टाकलेली पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. ‘बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, ‘शिष्य’ एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुखही नाही; पण निवडणूक आली की दिघे साहेब.


आज दिघे साहेबांवर आधारित ‘धर्मवीर’ नावाचा चित्रपट रिलीज झाला; पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही’, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे. आनंद दिघे यांचे कुटुंब राजकारणात सक्रिय नाही, असे निलेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चर्चेचा विषय ठरली आहे.


https://twitter.com/meNeeleshNRane/status/1525061245535068160

या चित्रपटाचा खास शो ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये शुक्रवारी पार पडला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल आणि लेझीम पथकाच्या तालास्वरात, मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या कटआउटसमोर विधिवत पूजा करित दुग्धाभिषेकही करण्यात आला.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेद्वारे २८ ऑक्टोबर २०२५

आजपासून मुंबईत 'इंडिया मेरीटाईम सप्ताह', केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : शंभराहून अधिक देशातील एक लाखापेक्षा अधिक प्रतिनिधी, ५०० प्रदर्शक, २०० पेक्षा अधिक तज्ज्ञ

दिवाळीनंतर मुंबई–पुणे–कोल्हापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास आता मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठी

सलमान खानच्या रियाधमधील भाषणावर वाद: पाकिस्तानच्या दहशतवादी यादीत नाव असल्याचे दावे खोटे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अलीकडील एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातील विधानामुळे सोशल मीडियावर वाद

समुद्रात जाणे टाळा ! हवामान विभागाचा मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : राज्यातील सागरकिनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,