नवी मुंबईत खासगी वाहनांचा अडथळा

नवी मुंबई (प्रतिनिधी) : कोणत्याही बस थांब्यावर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाला प्रतिबंध आहेत. या प्रकारचे नियम परिवहन विभागाने लागू केले आहेत. या प्रकारचा नियम असतानाही खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तसूभरही फरक पडल्याचे जाणवत नसल्याचे वास्तवदर्शी चित्र नवी मुंबई शहरातील महत्त्वाच्या मार्गावर दिसून येत आहे. यामुळे शासकीय व पालिकेच्या परिवहन उपक्रमाला दररोज लाखो रुपयांचा फटका बसत आहे.


खासगी वाहने थेट बस थांब्यावरच आक्रमण करत असल्याने शासकीय प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. ठाणे-बेलापूर महामार्गावर प्रवाशांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असते. या मार्गावर स्थानिक परिसरात प्रवाशांना सेवा देण्यासाठी नवी मुंबई महानगपालिकेच्या परिवहन विभागाच्या बसेस धावत असतात, तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे बेस्ट उपक्रम प्रवासी सेवा देत आहे.


दोन्हीही पालिकेच्या बसेस शहरभर मोठ्या प्रमाणात धावत असतात; परंतु उपलब्ध असणाऱ्या सर्वच थांब्यावर नियमबाह्य रिक्षाचालक थांब्यावर दबा धरून प्रवासी उचलण्याचा प्रकार नियमित चालू आहे. याचा फटका दोन्हीही परिवहन उपक्रमाला बसत आहे. तसेच शासनाच्या एसटी परिवहन सेवेस देखील बसत आहे.


अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या विविध वाहनांवर नियमित कारवाई करण्यात येत असते. कारवाईत सातत्य ठेवून पुढेही अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईल. - हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

Comments
Add Comment

प्रजासत्ताक दिनी राज्यपाल मुंबईत; उपमुख्यमंत्री शिंदे ठाण्यात ध्वजवंदन करणार!

मुख्यमंत्री फडणवीस दादरमध्ये, अजित पवार पुण्यात हजेरी लावणार मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी

रेडिओ क्लब जेट्टीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार - मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे

जलक्षेत्रांतील जमिनींच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणणार विशेष धोरण - मंत्री नितेश राणे यांनी घेतला ‘लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट युज पॉलिसी’चा आढावा

मुंबई : राज्यातील जलक्षेत्रांलगतच्या जमिनींचा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणस्नेही विकास साधण्यासाठी