निर्वाण

  116

हे सकल ब्रह्मांड ज्याने आपले घर मानले होते अशा थोर अवस्थेला पोहोचलेल्या पृथ्वीच्या आसनावर आरूढ होऊन, वायू भक्षून आणि दशदिशांचे वस्त्र परिधान करून कणकवलीच्या परिसरांत सुमारे चार तपे चिर मौन पाळून साऱ्या मानवजातीला दिव्यप्रकाश देणाऱ्या या धगधगत्या मार्तंडाचा, सूर्याचा अस्तसुद्धा अलौकिकच झाला. ज्याचा जन्मच अलौकिक, ज्याची कृती अद्भुत किंबहुना ज्यांचे जीवनच अति विलक्षण अशा दिव्यत्वाचा अंत चमत्कारिक झाला त्यात नवल कसले?


या जगात सर्व गती थांबतील किंवा थांबविता येतील. पण काळाची गती कोणीही रोखू शकणार नाही. कारण तसे घडेल तर ‘‘होणारे न चुके ब्रह्मादिका’ हे स्मृतिवाक्य खोटे ठरेल! ते कशाला? ‘‘नाशिवंत देह जाणार सकळ’ ही तुकोबांची अमर वाणी अपवाद कशी ठरेल? कार्य संपले की गेलेच पाहिजे ! हा जगाचा धर्म आहे. मग ते प्रभु रामचंद्र असोत अथवा, गोपाल कृष्ण असोत, ज्ञानदेव एकनाथ असोत किंवा तुकाराम, रामदास असोत, वा गाडगेबाबा भालचंद्रबाबा असोत. काळ थांबणारच नाही! मग कोण समाधी घेतो, तर कोण गुप्त होतो. कोण श्रीगाडगेबाबांसारखा चालत्या गाडीत देह ठेवतो, तर कोण श्रीभालचंद्र बाबासारखा भजनाच्या गजरात या चराचरांत, विश्वात विलीन होत


- राजाधिराज श्री भालचंद्र महाराज की जय!

Comments
Add Comment

देवर्षी नारद

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी विणेच्या मंजुळ तालावर “नारायण... नारायण” असा नाम जप करीत त्रैलोक्यात अनिरुद्ध

जाणिले ज्याने आयुष्याचे मर्म

मनाचा गाभारा : अर्चना सरोदेया क्षणभंगुर आयुष्य म्हणजे, जणू अळवावरचे पाणी!! क्षणांत भासे

देवाकरिता स्वतःला विसरावे

अध्यात्म ब्रह्मचैतन्य : श्री गोंदवलेकर महाराज तुम्ही स्वत:ला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? हल्ली आपण

सद्गुरू का हवे?

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै आज अध्यात्माच्या विरोधात काही विशिष्ट प्रवृत्ती निर्माण झालेल्या आहेत. देव

प्रयत्नांच्या सावल्यांत हरवत गेलेले रंग

ऋतुराज : ऋतुजा केळकर “काष्ठादग्निर्जायते मथ्यमानाद्भूमिस्तोयं खन्यमाना ददाति। सोत्साहानां नास्त्यसाध्यं

सोमवारी सोमप्रदोष शिवरात्री,पितृदोषातून मुक्त होण्यासाठी करा हे उपाय

सोमवार २७ जानेवारी २०२५ रोजी पौषातील सोमप्रदोष शिवरात्री आहे. या दिवशी मनापासून निवडक उपाय केल्यास पितृदोषातून