हे सकल ब्रह्मांड ज्याने आपले घर मानले होते अशा थोर अवस्थेला पोहोचलेल्या पृथ्वीच्या आसनावर आरूढ होऊन, वायू भक्षून आणि दशदिशांचे वस्त्र परिधान करून कणकवलीच्या परिसरांत सुमारे चार तपे चिर मौन पाळून साऱ्या मानवजातीला दिव्यप्रकाश देणाऱ्या या धगधगत्या मार्तंडाचा, सूर्याचा अस्तसुद्धा अलौकिकच झाला. ज्याचा जन्मच अलौकिक, ज्याची कृती अद्भुत किंबहुना ज्यांचे जीवनच अति विलक्षण अशा दिव्यत्वाचा अंत चमत्कारिक झाला त्यात नवल कसले?
या जगात सर्व गती थांबतील किंवा थांबविता येतील. पण काळाची गती कोणीही रोखू शकणार नाही. कारण तसे घडेल तर ‘‘होणारे न चुके ब्रह्मादिका’ हे स्मृतिवाक्य खोटे ठरेल! ते कशाला? ‘‘नाशिवंत देह जाणार सकळ’ ही तुकोबांची अमर वाणी अपवाद कशी ठरेल? कार्य संपले की गेलेच पाहिजे ! हा जगाचा धर्म आहे. मग ते प्रभु रामचंद्र असोत अथवा, गोपाल कृष्ण असोत, ज्ञानदेव एकनाथ असोत किंवा तुकाराम, रामदास असोत, वा गाडगेबाबा भालचंद्रबाबा असोत. काळ थांबणारच नाही! मग कोण समाधी घेतो, तर कोण गुप्त होतो. कोण श्रीगाडगेबाबांसारखा चालत्या गाडीत देह ठेवतो, तर कोण श्रीभालचंद्र बाबासारखा भजनाच्या गजरात या चराचरांत, विश्वात विलीन होत
– राजाधिराज श्री भालचंद्र महाराज की जय!
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…