मुंबई : हिंगोली जिल्ह्यातील एका व्यक्तीने कुटुंबातील दोन महिलांसह मंत्रालय परिसरात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. बांधकाम विभागातील कर्मचारी त्रास देत असल्यामुळे आम्ही हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सदर व्यक्तीने सांगितले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तिघांचेही प्राण वाचले आहेत.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने हंबरडा फोडत आपली व्यथा मांडली. ‘मी कर्ज घेऊन एका रस्त्याचे काम पूर्ण केले. या कामासाठी मला शासनाकडून १ कोटी ७० लाख रुपये मिळणे अपेक्षित असताना कसलीही रक्कम दिली जात नाही. याबाबत मी मंत्री अशोक चव्हाण यांचीही भेट घेतली होती. मात्र बांधकाम विभागातील कर्मचारी दखल घेत नाहीत, त्यामुळे माझ्यासमोर आत्महत्या हाच पर्याय आहे,’ असा आरोप सदर व्यक्तीने केला आहे.
मी भटक्या समाजातील असल्यानेच माझ्यावर अन्याय होत असल्याचा दावाही आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने केला.
दरम्यान, मंत्रालयाजवळच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता. पोलिसांकडून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींची समजूत काढण्यात येत आहे.
मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…
मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…
हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…
मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…