डहाणूत उन्हाळी भातशेती कापणीला सुरुवात

डहाणू (वार्ताहर) : सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी, कवडास या धरणांमधून उजव्या व डाव्या कालाव्याने अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. या कालव्यातील पाण्यावर उन्हाळी शेती केली जाते. यामध्ये प्रामुख्याने भातशेती केली जात असून, भाजीपाला, फुलझाडांचीही लागवड केली जाते.


पावसाळी भातशेतीपेक्षा उन्हाळी भातशेती ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या उन्हाळी भातशेतीच्या कापणीला सुरुवात झाली आहे. यावेळी भाताचे उत्पादन भरघोस निघाले आहे, असे येथील शेतकरी सांगत आहेत. उन्हाळी भातशेतीला पावसाळी शेतीप्रमाणे अतिवृष्टी, वादळवाऱ्याचा त्रास नसल्यामुळे उन्हाळी भातशेती चांगले उत्पादन देते. सोबत भाताची पावलीही खराब होत नसल्यामुळे तिलाही चांगला भाव मिळतो.


कासा, चारोटी, सारणी, उर्से, चिंचपाडा, वांगर्जे, सुर्यानगर, वाघाडी, धरमपूर व इतर भागात जिथून पाट-कालवे गेले आहेत. तिथे दुबार भातशेती केली जाते. मागील वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी व समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आलेल्या वादळामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बळीराजा हतबल झाला होता. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गकोपाने हिरावून नेला होता. परंतु यंदाच्या उन्हाळी उत्पादनाने शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार असल्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.


भातशेतीपाठोपाठ कालव्याच्या पाण्यावर अनेक ठिकाणी भाजीपाला लागवडही केली जात आहे. डहाणू तालुक्यातील शेतकरीवर्ग देखील आता भाजीपाला लागवडीकडे वळताना दिसत आहे. उन्हाळ्यात मिरची, गवार, वांगी, दुधी, मोगरा, झेंडू असे उत्पादन शेतकरी घेत आहेत.

Comments
Add Comment

जव्हार नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या पूजा उदावंत विजयी

जव्हार : जव्हार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवत नगर परिषदेवर

वाड्यात कमळ फुलले; नगराध्यक्षपदी भाजपच्या रिमा गंधे

उबाठा गटाचा उडवला धुव्वा वाडा : वाडा नगरपंचायतीच्या रविवारी झालेल्या मतमोजणीत भाजपाने नगराध्यक्ष पदासह १२

खासदारांची ‘फिल्डिंग’ होम ग्राउंडवर यशस्वी!

वाडा पालिकेत स्पष्ट बहुमतासह नगराध्यक्षही भाजपचा गणेश पाटील पालघर : जिल्ह्यात निवडणूक झालेल्या तीन नगर

पालघरमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेनेला कौल

तीन ठिकाणी नगराध्यक्षाच्या पक्षालाच बहुमत पालघर : पालघर जिल्ह्यात पार पडलेल्या तीन नगर परिषद आणि एका

कोण असणार शहराचा नवा शिलेदार?

आज दुपारपर्यंत चित्र होणार स्पष्ट सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी गणेश पाटील पालघर :

'प्रहार'च्या जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

निवडणुकीच्या तोंडावर आयात वाढली वसई : शहराच्या राजकारणात सक्रिय असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष