देशात आता ई-जनगणना होणार

Share

२०२४ पूर्वी पूर्ण होणार काम

गुवाहाटी (वृत्तसंस्था) : देशात पुढील जनगणना ई-जनगणना होणार आहे. कोरोनाची लाट कमी होताच ई-जनगणनेचे काम सुरू होईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी केली. ई-जनगणनेचे काम २०२४ पूर्वी पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गृहमंत्री अमित शहा यांनी गुवाहाटी येथे देशात प्रथमच होणाऱ्या ई-जनगणनेच्या पहिल्या इमारतीचे सोमवारी उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, दिल्लीतील राष्ट्रीय लोकसंख्या इमारतीचे बांधकाम या वर्षी ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल. हाय-टेक, त्रुटी-मुक्त, बहुउद्देशीय जनगणना अॅप जन्म, मृत्यू, कौटुंबिक आर्थिक स्थिती इत्यादी सर्व वैयक्तिक माहिती अपडेट करण्यास सक्षम असेल. त्यामुळे सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. यातून मिळालेल्या अनेक प्रकारच्या माहितीचा फायदा भावी सरकारांना मिळेल, जेणेकरून ते आपली धोरणे आणि अनेक लोकांसाठी काम करू शकतील.

आपण आतापर्यंत जनगणना अतिशय हलक्यात घेतली आहे. येत्या काळात जी काही जनगणना होईल ती ई-जनगणना असेल. पुढील २५ वर्षांसाठी ही जनगणना असेल. सर्वप्रथम मी स्वत: याची सुरुवात करणार आहे. मी माझ्या कुटुंबाची संपूर्ण माहिती सॉफ्टवेअरमध्ये टाकेन. यामध्ये जन्म-मृत्यू नोंदणीचीही व्यवस्था केली आहे, असेही शहा यांनी सांगितले. ही जनगणना संपूर्ण देशासाठी महत्त्वाची असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

आसामसाठी ते खूप महत्त्वाचे आहे. काय नियोजन करावे लागेल हे जनगणनाच सांगू शकते. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनाही याच आधारावर तयार केल्या जातात. अचूक जनगणनेच्या आधारे २०४७ मध्ये भारत स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल तेव्हा देश प्रत्येक क्षेत्रात पुढे असेल. देशात अनेक त्रुटींची चर्चा केली जाते. पाणी नाही, रस्ता नाही. प्रत्येकजण उणिवांवर चर्चा करतो; परंतु ते कसे दूर करावे हे कोणीही सांगत नाही. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी जनगणना आवश्यक आहे. यावरून कुठे विकासाची गरज आहे हे कळेल, असे ते म्हणाले.

Recent Posts

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, एक ठार तर अनेकजण गंभीर जखमी

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…

1 hour ago

मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा; राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा

ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…

1 hour ago

फडणवीस सांगतील तसं चालणार! थोपटेंनंतर तांबेही भाजपाच्या दिशेने?

पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…

1 hour ago

Sangram Thopte : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या माजी आमदारांनी हाती घेतले ‘कमळ’

पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…

2 hours ago

Tiger Shroff: टायगर श्रॉफला जीवे मारण्याची धमकी! खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला पंजाबमधून अटक

मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…

2 hours ago

Nitesh Rane : राज्य सरकारचा मत्स्य व्यवसायाबाबत गेमचेंजर निर्णय!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…

2 hours ago