राणे, राणा दिसतात; मग शेख, पठाण दिसत नाहीत का?

मुंबई : “बेहरामपाडा दिसत नाही आणि शाहीन बागवर कारवाई केल्यावर आरडाओरड करता. राणे, राणा दिसतात पण शेख, पठाण दिसत नाहीत. ते अनिधिकृत नाहीत असे म्हणायचे आहे का? आम्ही कोणाच्या विरोधात नाही पण अनधिकृत बांधकामावरील कारवाई आडनावे बघून केली जात आहे,” असा आरोप भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.


“शाहीन बाग आणि जहांगीरपुरीमध्ये आम्ही बुलडोझर बघितले. हे दिल्लीच्या महापालिकेचे काम आहे. पण गेल्या २५ वर्षात नागपाडा, मोहम्मद अली रोड, मुख्यमंत्र्यांच्या शेजारी असलेल्या बेहरामपाडा इथे सत्ताधारी शिवसेनेने कधीच बुलडोझर नेला नाही, हा फरक आहे,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.


“राणे, राणा, कंबोज, राणावत यांना महापालिकेकडून घरे तोडण्यासाठी नोटीस दिल्या जात आहेत. गेल्या २५ वर्षात खान, पठाण, शेख यांनी अनधिकृत बांधकाम केले नाही का? हा जाती, धर्मभेद नाही; तर अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी आहे,” असे आशिष शेलार म्हणाले.


राज्यातील पोलीस हनुमान भक्तांना, हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना पकडतात, असा आरोपही यावेळी आशिष शेलार यांनी केला. राज्याची यंत्रणा राम भक्तांवर कारवाई करत आहे. तर दुसरीकडे केंद्रीय यंत्रणा दाऊदच्या हस्तकांना पकडायला निघाली आहे. हा फरक राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी सरकारच्या कामकाजातील आहे, असे आशिष शेलार म्हणाले.


मुंबई महापालिका अनधिकृत बांधकामांच्या कारवाईबाबत एकही शब्द काढत नाही किंवा कारवाई करत नाही. पण केंद्रीय यंत्रणा अवैध कामांवर कारवाई करतात, म्हणून मग महाविकास आघाडी सरकारकडूनही कारवाई केली जाते. त्यामुळे मुंबई महापालिका ही आडनाव बघून कारवाई करते असा घणाघात अशिष शेलार यांनी केला.


उत्तर प्रदेश सरकार मुंबईत कार्यालय सुरु करणार असल्यासंबंधी विचारले असता आशिष शेलार म्हणाले की, “योगींनी उत्तर प्रदेशात लता मंगशेकरांच्या नावे चौक केला. मग हा मुंबई, महाराष्ट्र आणि देशाचा सन्मान नाही का?”.


“अयोध्येतील नगरपालिकेला जागा ठरवून लता मंगेशकरांचा सन्मान करा हे सांगणारे भाजपाचे सरकार आहे. मुंबईत भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम झाला आणि श्रद्धांजलीसाठी हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरी वाजवली. केंद्र सरकारच्या संस्कृती विभागाने यासाठी मदत केली आणि महाराष्ट्र सरकार झोपून होते. शिवसेनेचा मराठी मुद्दाही गेला आहे आणि हिंदुत्वाशी संबंधही राहिलेला नाही,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

Comments
Add Comment

उन्नती, प्रगती, विकासासाठी मुंबईवर महायुतीचा भगवा फडकलाच पाहिजे!

भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन मुंबई (खास प्रतिनिधी) :

विश्वचषक विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही राज्य सरकारकडून विशेष गौरव! जेमिमा, स्मृती आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

दादरच्या 'स्टार मॉल'मध्ये भयंकर आग!

सेनाभवनसमोर असलेल्या मॉलमध्ये मॅकडोनाल्ड्सच्या किचनमध्ये आग! मुंबई : दादर पश्चिम येथील गजबजलेल्या स्टार

मेट्रो प्रवाश्यांसाठी महत्वाची बातमी ! राज्य सरकार दरवाढीच्या तयारीत

मुंबई : रेल्वे प्रमाणे मेट्रोलाही मुंबईकरांच्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. मुंबईत २०१४ पासून सुरू झालेले

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत

मुंबई : आपल्या कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर

मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर, चेंबूरमधील नागरिकांना धो धो पाणी, चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे जलाशय जलबोगदा महिना अखेर होणार कार्यान्वित

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे जलशयापर्यंतच्या