पाथरज गावाला मृत म्हशींमुळे दूषित पाणीपुरवठा

नेरळ (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील पाथरज गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या वरच्या भागातील तलावात एक म्हैस मृत झाली आहे. त्या म्हशीच्या शरीराचे अवयव कुजले असल्याने ग्रामस्थांना होणारा पाणीपुरवठा दूषित झाला आहे. दरम्यान, या दूषित पाण्याने ग्रामस्थांना साथीच्या रोगांची लागण होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.


कर्जत पाथरज ग्रामपंचायत मधील ८० ते ८५ घरांची लोकवस्ती असलेल्या पाथरज गावाला दोन ते तीन दिवस दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. ग्रामस्थांनी गावात ज्या विहिरींमधून पाणी येते त्या विहिरींची जाऊन पाहणी केली असता त्या विहिरींच्या वरच्या भागात असलेल्या तळ्यात म्हैस मरून पडलेली दिसून आली. अनके दिवस ती म्हैस त्या विहिरीत पडलेली असल्याने मृत अवस्थेतील ती म्हैस सडून गेली होती. त्या तळ्यातील पाणी पाझरून विहिरीत येते व तेच पाणी पाथरज गावातील टाकीत साठवले जाते आणि ते सर्व पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. पाथरज गावासाठी आठ वर्षापूर्वी गाव तलाव - विहिर जिल्हा परिषद फंडातून बांधण्यात आली होती. त्याच विहिरीजवळ तळे आहे. त्या तलावात २० दिवसापूर्वी म्हैस मरून पडली होती.

दुर्गंधीयुक्त पाणी पिल्याने काही ग्रामस्थ अजारी सुद्धा पडले आहेत. ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी स्वच्छ मिळावे यासाठी ती विहिर काही ग्रामस्थांच्या मदतीने साफ करून त्यामधील पाणी बाहेर काढून फेकले आहे. मात्र तरीदेखील ग्रामस्थ यांच्या मनात दूषित पाणी पिल्याने साथीचे रोगांना निमंत्रण द्यावे लागू शकते अशी भीती निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

टाटा मिनी बसचा अपघात, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेल्या दोघांचा मृत्यू

कर्जत : समृद्धी महामार्गावर कर्जतजवळ बोगद्यात टाटा मिनी बसचा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे

अरे बापरे! मांडवा जेट्टीच्या नव्या पुलाचे खांब निकामी होण्याच्या मार्गावर; जेट्टी कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता

लोखंडी सळ्याही आल्या बाहेर, मूलभूत सुविधांचाही अभाव अलिबाग : गेटवे-मुंबई ते मांडवा-अलिबागला जलमार्गाने

रायगड जिल्ह्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

अलिबाग  : आलिशान चारचाकी वाहनाने रेकी करून रायगड जिल्ह्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

कर्जत : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत - सीएसएमटी (मुंबई सीएसएमटी किंवा छत्रपती

ताम्हिणी घाटात भीषण अपघात, दरड गाडीवर कोसळल्याने महिलेचा मृत्यू!

रायगड: सनरुफ असलेल्या आलिशान चारचाकीवर दरड कोसळल्याची घटना पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात घडली आहे. ही

इंदापूर-कशेडी दरम्यान ९ महिन्यांत ३६ जणांचा मृत्यू

मुंबई - गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरण कामाचा फटका अलिबाग  : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या