पालघरमधील मच्छीमार, शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा

  51

बोईसर (वार्ताहर) : बंगालच्या उपसागरात येत्या काही दिवसांनी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याचा अंदाज भारतील हवामान खात्याने वर्तवला आला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या १९ तारखेपासून मे महिन्याच्या अखेरपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने पालघर जिल्ह्यातील शेतकरी आणि वीट उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे.


मान्सूनपूर्व पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना आखण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. वादळ काळात मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास मनाई केली आहे. चालू हंगामात दुबार भातशेतीची कापणी तर भुईमुग, भाजीपाला, आंबा आणि काजूची काढणी शिल्लक आहे. वादळी वारे, पावसामुळे तयार पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खबरदारीच्या उपाययोजना आखण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.


गेल्या वर्षी मे महिन्याच्या मध्यात आलेल्या तोक्ते वादळामुळे जिल्ह्यातील दुबार भातशेती, आंबा,काजू, जांभूळ शेती आणि वीट उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांच्या छताचे पत्रे उडाले होते, तर घरांवर झाडे कोसळून घरांचे नुकसान झाले होते. काही घरे कोसळली होती. वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.


कापणीसाठी तयार झालेल्या उन्हाळी भातापिकाच्या शेतातील पाण्याचा निचरा करुन भाताची कापणी करून मेच्या १५ तारखेपूर्वी काढणी करावी. त्यानंतरच्या दोन दिवसांत वाळवणी व झोडणी करुन भाताची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, मे नंतर तयार होणाऱ्या भातपिकावर उचित किडरोग व्यवस्थापन करावे, पावसात भिजून भाताचा पेंढा वाया जाऊ नये यासाठी पेंढ्याची (पावल्या) सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.


भुईमुगाचे डहाळे जमिनीत पुरेसा ओलावा असताना उपटून घेऊन शेंगा काढाव्या. काढलेल्या शेंगा पाच दिवस उन्हात चांगल्या वाळवून घ्याव्या, मच्छीमारांनी मच्छिमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

न्यू इंग्लिश स्कूल सोनाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू

वाडा : वाडा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सोनाळे या विद्यालयात एका पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गेल्या दि.

४०० खाटांच्या हॉस्पिटलसाठी सातबाऱ्याचा अडसर!

२५ कोटींचा निधी डीपीसीकडे पडून विरार : नालासोपारा मौजे आचोळे, येथे प्रस्तावित असलेल्या ४०० खाटांच्या

वसई -विरार शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य

कचराकुंडीत कचरा जमा करण्याचे पालिकेकडून आवाहन वसई : वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. वाढते

घनकचरा व्यवस्थापनासाठी कंत्राटदारांची स्पर्धा

कंत्राटासाठी पहिल्यांदाच ४६ निविदा  विरार : वसई-विरार पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्याने मागविण्यात

खोडाळा हायस्कूलचे पत्रे पावसाळ्यातही गायब !

मोखाडा : खोडाळा येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळ संस्थेची अनुदानित शाळा आहे. या शाळेत खोडाळा आणि