भोंगा आंदोलनाचा लोककलावंतांना फटका

  85

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सुरू झालेल्या भोंगा नाट्यामध्ये लोककलावंत भरडून निघत आहेत. कोरोनानंतर दोन वर्षांनी लोककलांना आणि कार्यक्रमांना चालना मिळू लागली होती. जत्रा, यात्रांमध्ये कार्यक्रम रंगू लागले आहेत. त्यातच भोंग्यांवरून राजकारण सुरू झाल्याने आता कार्यक्रमांदरम्यान पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे, अशी तक्रार लोककलावंत करत आहेत. याचा परिणाम गरीब कलाकारांवर होत असल्याचे लक्षात घेतले जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.


खान्देश लोककला अकादमीचे शेषराव गोपाळ यांनी राजकारणाचा परिणाम थेट तमाशावर झाल्याचा आक्षेप नोंदवला. ‘राजकारणामुळे मंदिरे, मशिदी यावरील भोंगे बंद करण्याबाबत काही फतवे काढण्यात आले. त्यामुळे आता धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये काही पोलिस ठाण्यांच्या क्षेत्रांत तमाशासाठी भोंगे लावण्यास बंदी करण्यात आली. तमाशा सुरू होण्याआधी पोलिस ठाण्यांकडून भोंगे लावू नका अशी पूर्वसूचना देण्यात येते,’ असे त्यांनी सांगितले.


‘दोन वर्षांहून अधिक काळ तमाशा बंद होता. कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. सरकारने कुठलीही भरीव मदत केली नाही. त्यानंतर आता तमाशा पुन्हा चालू झाला आणि हातात पोटापुरते पैसे येऊ लागले होते. त्यातच भोंग्यांच्या राजकारणामुळे तमाशा कसा करायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे,’ अशी व्यथा लोककलाकार मांडत आहेत. आवाज नसेल तर सादरीकरण करायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. राजकारणामुळे लोककलावंतांची उपजीविका बुडेल, असा कधी विचारही कोणी केला नव्हता, अशी भावनाही व्यक्त केली जात आहे. लोककलावंतांनी कार्यक्रम कसे करावेत, याबद्दलही भोंग्यांवरून राजकारण करणाऱ्यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी आता करण्यात येत आहे.


निवडणुकीच्या वेळी किंवा इतर सभांच्या वेळी राजकारणी भोंगे लावणार नाहीत आणि त्यांची ध्वनिमर्यादा नोंदवून समन्यायी पद्धतीने कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा लोककलावंत करत आहेत.


'परवानगी घेऊन कार्यक्रम करा'


कार्यक्रम सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत परवानगी घेऊन करता येतील, असे पोलिसांनी सांगितले. यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यांशी संपर्क साधता येईल; तसेच पोलिसांच्या वेबसाइटवरही अर्ज उपलब्ध आहेत. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन करून आवाजाची पातळी ठेवावी. आवाजासाठी परवानगी घेतली नसल्यास कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. रात्री १० वाजल्यानंतरचे कार्यक्रम ध्वनिक्षेपकाशिवाय करता येतील. धनिक्षेपक नसतानाही आवाजाबद्दल तक्रार आल्यास कारवाई करावी लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला.

Comments
Add Comment

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री

मुंबईत गिरगाव चौपाटीवर लक्ष्मण हाकेंचं आंदोलन, पाण्यात उभं राहून घोषणाबाजी

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण कमी करू नये, ही मागणी घेऊन लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत.

Sudhir Mungantiwar : हिंदीला विरोध आणि इंग्रजीला आलिंगन! महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ आमदारांना मराठी नकोशी

विधानसभा अध्यक्षांकडे इंग्रजी कामकाजपत्रिकेची मागणी मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत कामकाजाची पत्रिका

Narayan Rane : घरी बोलवा, मिठ्या मारा; एवढा गवगवा का? राणेंचा एकाचवळी दोन्ही ठाकरे बंधूंवर घणाघात; दिशा सालियन बद्धल काय म्हणाले नारायण राणे?

मुंबई : एकमेकांना घरी बोलवा, जेवा, मिठ्या मारा. पण मराठीसाठी एकत्र येतायत असं भासवण्याचं कारण काय? काय केलं