दिवसभरात १२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

  24

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात असली तरी रुग्णसंख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत वाढ होऊन १०० पेक्षा अधिक रुग्णसंख्या आढळून येत होती. दरम्यान रविवारी १२३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात कोरोनाने शून्य मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ८१५ सक्रिय रुग्ण आहेत.


मुंबईत रविवारी १२३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. दिवसभरात ९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६० हजार ७२९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४० हजार ३५१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८१५ सक्रिय रुग्ण आहेत.


रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ६४९४ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१० टक्के इतका आहे. मुंबईत रविवारी आढळून आलेल्या १२३ रुग्णांपैकी ११९ म्हणजेच ९७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २५ हजार ९५९ बेड्स असून त्यापैकी २४ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्यांहून अधिक बेड रिक्त आहेत.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता