सायकलिंग आणि चालण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील मार्गिका खुली

कल्याण (वार्ताहर) : माय सिटी, फिट सिटी या महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेनुसार कल्याण रिंग रोडवरील गांधारे ब्रिज ते बारावे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि डोंबिवली येथील पत्रीपूल ते ९० फुटी ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्ता हे दोन रस्ते शनिवारपासून सकाळी ५ ते ८ या वेळेत महापालिका परिसरातील नागरिकांसाठी केवळ सायकलिंग आणि चालण्यासाठी खुले ठेवण्यात आले आहेत.


या वेळेत या दोन्ही रस्त्यांवरील एका बाजूची सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. माय सिटी फिट सिटी ही संकल्पना नागरिकांच्या सहकार्याने राबविण्याचे ठरविले असून विशेषत: कल्याण व डोंबिवलीमध्ये प्रत्येकी एक रस्ता सकाळी ५ ते ८ या वेळेत सायकलिंग आणि चालण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. सायकलिंग आणि चालताना वाहनांची ये-जा चालू असल्यास सातत्याने एक प्रकारचे मानसिक दडपण राहते, त्यामुळे हे रस्ते सकाळच्या वेळेत राखीव ठेवले आहेत. नागरिकांच्या सूचनेनुसार व आवश्यकतेनुसार वाहतूक पोलिसांच्या मदतीने आणखी काही रस्ते यासाठी राखीव ठेवले जातील, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी सकाळी ९० फुटी ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्त्यावर बोलताना दिली.


नागरिकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा उद्देशाने महापालिकेने सुरू केलेला हा उपक्रम अतिशय स्वागतार्ह आहे, असे मत यावेळी उपस्थित सायकलपटूंनी व्यक्त केले.


या उपक्रमावेळी पहाटे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचेसह त्यांच्या पत्नी डॉ. आरती सूर्यवंशी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, सत्यवान उबाळे, सचिव संजय जाधव, महापालिका उपायुक्त धैर्यशील जाधव, अतुल पाटील, स्वाती देशपांडे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता व्ही. एस. पाटील, रोहिणी लोकरे, प्रशांत भागवत, वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश गीते उपस्थित होते.

Comments
Add Comment

ठाण्यात २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

ठाणे: 'ठाणे महानगरपालिकेने' (TMC) जाहीर केले आहे की, ठाणे शहराच्या काही भागांमध्ये २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा; कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरणात निर्दोष मुक्तता

कल्याण: माजी आमदार गणपत गायकवाड यांना एक मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. २०१४ मध्ये कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस

ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार! हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: ठाण्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता, उपमुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर

जड वाहने रात्री १२ नंतर सोडण्याचे शिंदे यांचे आदेश ठाणे: घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत

अंबरनाथ, बदलापुरात यंत्रणा कुचकामी

रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये विषारी रसायने अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरवासीयांना पाणी व

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये