लांजा तालुक्याच्या पूर्व भागात भीषण पाणीटंचाई

लांजा (वार्ताहर) : उन्हाच्या वाढत्या तीव्र झळांनी लांजा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये दर वर्षी पाणीटंचाईचा चटका बसणाऱ्या कोचरी भोजवाडी, चिंचुर्टी व कोंडगेमधील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. दरम्यान लांजा पंचायत समितीमार्फत या वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.


दर वर्षी शासनामार्फत पाणीटंचाई दूर करण्यासाठी लांजा तालुक्यात लाखो रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. मात्र पाणीटंचाई अद्यापही कमी झालेले नाही. तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरदऱ्यात आणि दुर्गम भागात वसलेल्या कोचरी गावातील भोजवाडी, चिंचुर्टी गावातील धनगर वाडी आणि बौद्धवाडी, तर कोंडगे धनगरवाडी या वाड्यांना सध्या तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. धावडे वाडी, भोजवाडी येथील विहिरी आटल्याने आणि पाण्याचे मुख्य स्त्रोत देखील आटल्याने येथील ग्रामस्थांवर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. मे महिन्यात ही दाहकता अधिक वाढली आहे.


कोचरी व कोंडगे गावांत काही दिवसांपूर्वी टँकर सुरू करण्यात आला आहे, तर चिंचुर्टी धनगरवाडी आणि बौद्धवाडी येथील ग्रामस्थांचे पाण्यापासून होणारे हाल लक्षात घेऊन लांजा पंचायत समितीमार्फत या गावात बुधवारी ४ मे पासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

समृद्ध पंचायतराज अभियानातून राज्यात सर्वाधिक बक्षिसे मतदार संघाने मिळवावीत: ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम

समृद्ध पंचायतराज अभियानासाठी विशेष प्रयत्न करा दापोली: ग्रामविकास व पंचायतीराज विभागामार्फत राबविण्यात

भक्ती मयेकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट: आरोपी दुर्वास पाटीलच्या वडिलांचीही चौकशी, बारमधून महत्त्वाचा पुरावा जप्त

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील तिहेरी खून प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. मुख्य

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षण भिंत कोसळल्याने गणेशोत्सवात सीएनजीचा पुरवठा बंद; वाहनचालकांची धावपळ

मंडणगड: गणेशोत्सवादरम्यान मंडणगडमधील एकमेव सीएनजी पंप बंद झाल्याने स्थानिक वाहनचालक आणि गणेशभक्तांची मोठी