केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले

देहराडून : १२ ज्योतिर्लिंगांमध्ये विशेष स्थान असणाऱ्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांनंतर आज, शुक्रवारी सकाळी ६.२५ वाजताच्या शुभ मुहुर्तावर भाविकांसाठी खुलं करण्यात आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मंत्रोच्चारात हा सोहळा पार पडला. मंदिर उघडण्याच्या वेळी हजारोंच्या संख्येने भाविकही उपस्थित होते. मंदिराला फुलांची आकर्षक आणि मनमोहक सजावट करण्यात आली होती. यासाठी सुमारे १० क्विंटल फुलांचा वापर करण्यात आलं. मंदिर उघडण्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासूनच भाविकांची रीघ पाहायला मिळाली. केदारनाथचे मंदिर हे उत्तर आणि दक्षिण भारतातील धार्मिक संस्कृतीचा संगम मानला जातो.


गुरुवारी सकाळी गौरीकुंड येथून हजारो भाविक केदारनाथ धामकडे रवाना झाले. भाविकांनी येथून सुमारे २१ किमी अंतर पायी, घोडा किंवा पिठूने पार केले. गुरुवारी सकाळी ६ वाजता सुरू झालेला प्रवास केदारनाथ धाम येथे सायंकाळी ४ वाजता संपला. क्षमतेपेक्षा जास्त भाविक आल्याने प्रशासनाची चिंता वाढली होती. शुक्रवारी सकाळी सर्वांना केदारनाथला जाण्याची परवानगी देण्यात आली.


अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. चारधाम यात्रेमध्ये केदारनाथ धामचे स्थान तिसरे आहे. गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे दरवाजे अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर उघडण्यात आले. केदारनाथ मंदिर आज खुलं करण्यात आलं आहे. तर यानंतर बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे ८ मे रोजी खुले करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

"दिपू दासच्या मृत्यूला जबाबदार कोण?" बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोलकाता : भारतीय राजकारणात पश्चिम बंगाल हे नेहमीच संघर्षाचे केंद्र राहिले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

विवाह हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नव्हे...

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत कोलकाता : "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो