केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले

देहराडून : १२ ज्योतिर्लिंगांमध्ये विशेष स्थान असणाऱ्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांनंतर आज, शुक्रवारी सकाळी ६.२५ वाजताच्या शुभ मुहुर्तावर भाविकांसाठी खुलं करण्यात आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मंत्रोच्चारात हा सोहळा पार पडला. मंदिर उघडण्याच्या वेळी हजारोंच्या संख्येने भाविकही उपस्थित होते. मंदिराला फुलांची आकर्षक आणि मनमोहक सजावट करण्यात आली होती. यासाठी सुमारे १० क्विंटल फुलांचा वापर करण्यात आलं. मंदिर उघडण्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासूनच भाविकांची रीघ पाहायला मिळाली. केदारनाथचे मंदिर हे उत्तर आणि दक्षिण भारतातील धार्मिक संस्कृतीचा संगम मानला जातो.


गुरुवारी सकाळी गौरीकुंड येथून हजारो भाविक केदारनाथ धामकडे रवाना झाले. भाविकांनी येथून सुमारे २१ किमी अंतर पायी, घोडा किंवा पिठूने पार केले. गुरुवारी सकाळी ६ वाजता सुरू झालेला प्रवास केदारनाथ धाम येथे सायंकाळी ४ वाजता संपला. क्षमतेपेक्षा जास्त भाविक आल्याने प्रशासनाची चिंता वाढली होती. शुक्रवारी सकाळी सर्वांना केदारनाथला जाण्याची परवानगी देण्यात आली.


अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. चारधाम यात्रेमध्ये केदारनाथ धामचे स्थान तिसरे आहे. गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे दरवाजे अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर उघडण्यात आले. केदारनाथ मंदिर आज खुलं करण्यात आलं आहे. तर यानंतर बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे ८ मे रोजी खुले करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा