Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्रफूस लावून तीन मुलींचे अपहरण

फूस लावून तीन मुलींचे अपहरण

नाशिक (प्रतिनिधी) : शहर परिसरात काल वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन मुलींचे फूस लावून अपहरण करण्यात आल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अपहरणाचा पहिला प्रकार जेलरोड परिसरात घडला. फिर्यादी महिलेची मुलगी ही दि. १ मे रोजी सकाळी ७ वाजता घरात पाणी भरत असताना कोणासही काहीही न सांगता निघून गेली. ती यापूर्वीदेखील दोन वेळा घरातून निघून गेली होती. ती काही दिवसांनी परत आली; मात्र दि. १ मे रोजी निघून गेल्यानंतर ती अद्याप घरी परतली नाही. तिचा परिसरात मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

त्यामुळे फिर्यादी महिलेची खात्री झाली, की तिला कोणी तरी अज्ञात इसमाने फूस लावून अज्ञात कारणासाठी पळवून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बकुळे करीत आहेत.

अपहरणाचा दुसरा प्रकार राजराजेश्वरी चौकानजीक घडला. फिर्यादी महिलेची मुलगी ही दि. १ मे रोजी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास घरी होती. त्यादरम्यान आरोपी केतन आढाव (रा. दसक गाव, जेल रोड) याने मुलीला काही तरी फूस लावून फिर्यादी मुलीच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात संशयित केतन आढाव विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर अपहरणाचा तिसरा प्रकार चुंचाळे येथे घडला. फिर्यादी महिलेच्या मुलीला राहत्या घरातून दि. २ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास दत्तनगर येथून अज्ञात इसमाने आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. तसेच फिर्यादी महिलेच्या कायदेशीर रखवालीतून अपहरण केले. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -