नवी दिल्ली (हिं.स) : पंतप्रधान नरेंद मोदी रविवार २९ मे सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मन की बात चा हा ८९ वा भाग असेल. २०२२ वर्षाचा हा पाचवा भाग असणार आहे.
नागरिक २६ मे पर्यंत ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी माय गोव्ह, नमो अप्लिकेशन किंवा १८००११७८०० क्रमांकाच्या माध्यमातून ध्वनिमुद्रित करून सूचना, अभिनव कल्पना आणि नव-नवीन उपक्रमांबद्दल माहिती पाठवू शकतात.
मन की बात चे थेट प्रसारण नमो आप्लिकेशन, दूरदर्शन, प्रसार भारती आणि आकाशवाणीच्या सर्व प्रदेशिक केंद्रांद्वारे, तसेच केंद्र सरकारच्या विविध सामाजिक माध्यमांद्वारे केले जाते. मुख्य भागाच्या प्रसारणानंतर हिंदी शिवाय इतर भारतीय भाषांमध्येही मन की बात चे प्रसारण आयोजित केले जाते.