ठाकरे कुटुंबीयांच्या कथित बंगले प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका

  54

अलिबाग (वार्ताहर) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या मुरूड तालुक्यातील कोरलई येथील कथित १९ बंगले प्रकरणात आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली. यासंदर्भातील कच्चा ड्राफ्ट तयार झाला असून लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल, असे सोमय्या यांनी स्पष्ट केले.


मंगळवारी अलिबाग येथील आपल्या निवासस्थानी आलेल्या सोमय्या यांनी बुधवारी सकाळी अलिबागमधील १० वकिलांना निमंत्रित केले होते. ठाकरे कुटुंबियांच्या कोरलई येथील जागेवरील कथित १९ बंगल्याच्या प्रकरणाची माहिती या सर्व वकिलांना दिली तसेच माहितीच्या अधिकारात मिळवलेली कागदपत्रे सादर केली. वकिलांनी या सर्व बाबींचा अभ्यास करून सोमय्या यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे सामूहिक मत नोंदवले. त्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील कच्चा ड्राफ्टदेखील तयार करण्यात आला असून आठवडाभरात त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी