संपानंतर लालपरी सुस्साट

  61

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या एसटी बसेसची वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत असून कर्मचाऱ्यांच्या संपानंतर बसेस पुन्हा एकदा रस्त्यांवर धावताना दिसू लागल्या आहेत. ऐन सुट्टीच्या आणि लग्नसराईच्या मे महिन्याच्या दिवसांत एसटी बसेस धावू लागल्यामुळे गावागावांतील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. त्याचबरोबर एसटीच्या उत्पन्नातही कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत.


गेल्या काही दिवसांमध्येच एसटीने २६९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सुमारे पाच महिन्यांहून अधिक काळ संपावर गेल्यावर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर ९६ टक्क्यांहून अधिक एसटी कर्मचारी आता कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रस्त्यांवर एसटी पुन्हा धावू लागली आहे. सध्या एसटीची प्रवासी संख्या २२ लाखांवर गेली आहे. यातून महामंडळाच्या तिजोरीत प्रतिदिवस सरासरी १३ कोटींचा महसूल जमा होत आहे. गेल्या महिन्यात प्रथमच एसटी महामंडळाने २६९ कोटी ५९ लाख ४४ हजार रुपयांचा महसूल गोळा केला आहे.


एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यांपासून संप पुकारला होता. तसेच संपकरी कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल २०२२ पर्यंत कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत मोठ्या प्रमाणात संपकरी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यानुसार आतापर्यंत महामंडळात ८३ हजार कर्मचारी हजर झाले आहेत. हजर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने महामंडळाने राज्यातील एसटीची वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.


कोरोना पूर्वकाळात एसटी महामंडळाच्या बसेसमधून दररोज ६५ लाख प्रवासी प्रवास करत होते. एसटी महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून प्रत्येक दिवशी २१ कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतूक अंशतः सुरू असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. मात्र आता न्यायालयाच्या निर्देशानंतर कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. राज्यभरात १२ हजार ५८६ एसटी बसेसमार्फत ३१ हजार ५०० पेक्षा अधिक एसटीच्या फेऱ्या सुरू असून प्रवासी संख्या २२ लाखपर्यंत पोहोचली आहे. त्यातून एसटी महामंडळाला दररोज सरासरी १३ कोटी रुपयांचे महसूल मिळत आहे.


चार हजार एसटी बस नादुरुस्त


सध्या महामंडळाच्या ताफ्यात १६ हजार एसटी बसेस आहेत, त्यापैकी १२ हजार एसटी बसेस रस्त्यावर धावत आहेत. तसेच ४ हजार बसेस वेगवेगळ्या कारणाने आगारात बंद पडून आहेत. त्या लवकरात लवकर दुरुस्त करून मार्गस्थ करणे हे यांत्रिक कर्मचाऱ्यांपुढील महत्त्वाचे आव्हान आहे.

Comments
Add Comment

Ashish Shelar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत पारदर्शकता आणू : मंत्री आशिष शेलार

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेची प्रक्रिया आँनलाईन व

Dada Bhuse : खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई होणार : शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यातील काही शाळांनी शासकीय लाभ आणि विशेष सवलती मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर करून ‘अल्पसंख्यांक’

Devendra Fadanvis : पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; SDRF आणि NDRF यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री

नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन मुंबई : मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात

Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad : आमदार गायकवाड बनियान-टॉवेलवर येतो अन् कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याची धुलाई; देवेंद्र फडणवीस म्हणाले, कारवाई...

मुंबई : नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तवणूक आमदार

'जेएनपीटी आणि वाढवन बंदर प्राधिकरणांसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता' – मंत्री नितेश राणे

* परदेशी पतसंस्था १२० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार * बंदरे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण

अभिनेत्री आलिया भटला असिस्टंटने लावला ७७ लाखांचा चूना

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटची माजी पर्सनल असिस्टंट वेदिका प्रकाश