परवानगी घेऊनच भोंग्यांचा वापर करण्याच्या मशिदींना सूचना

अलिबाग (वार्ताहर) : मशिदींवरील भोंगे हटवा अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्यानंतर रायगडमधील पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. रायगड जिल्ह्यातील मशिदींवरील भोंगे हे अधिकृत असल्याची बाब समोर आली आहे. ज्या मशिदींनी अद्याप भोंग्यासाठी परवानगी घेतलेली नाही त्यांना परवानगी देण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे, असे रायगड पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


जिल्ह्यात २६६ मशिदी आहेत. यापैकी २६१ मशिदींना पोलिसांकडून भोंगे लावण्यासाठी नियमानुसार अनुमती देण्यात आली आहे. दर दोन महिन्यांनी या परवानगीचे नुतनीकरण करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत अटी व शर्तींच्या आधीन राहून नियमानुसार ही परवानगी दिली जाते. त्यामुळे नियमानुसार बसविण्यात आलेले भोंगे हटवण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.


ज्या मशिदींनी भोंग्यासाठी अद्याप परवानगी घेतलेली नाही, त्यांना नियमानुसार परवानगी घेऊन भोंगे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणी नियमांचे उल्लंघन केलेच तर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी स्पष्ट केले.


पोलीस बंदोबस्तात वाढ


मंगळवारी साजरा करण्यात येणाऱ्या रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य राखीव दलासह, दंगल नियंत्रण पथके आणि शीघ्र कृती दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.


मुस्लीम समाजाचा हा सण शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यात ७ शिघ्र कृती दल, २ दंगल नियंत्रण पथक, २ राज्य राखीव दलाच्या पथकांसह जिल्ह्यातील १७०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, तसेच २५० गृह रक्षक दलाचे जवान तैनात केले जाणार आहेत. दरम्यान रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमार्फत शांतता कमिट्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक सलोखा कायम राखण्याचे आवाहनही पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.


रायगड पोलीस क्षेत्रातील सर्व मशिदींना परवानगी घेऊनच भोंग्यांचा वापर करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच या परवानगी दिल्या जातात. पुढील दोन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल. परवानगी न घेता भोंग्यांचा वापर केल्यास किंवा वापर करताना नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. - अशोक दुधे, पोलीस अधीक्षक, रायगड

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग