बालकांचे आरटीई प्रवेश घेण्यासाठी १० मे २०२२ पर्यंत मुदतवाढ

Share

मुंबई (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ या वर्षाकरीता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत संचालनालयाचे दिनांक २० एप्रिल २०२२ रोजीच्या पत्रान्वये दिनांक २९ एप्रिल २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. याबाबत निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचे दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त सुधारित निर्देशांनुसार दिनांक १० मे २०२२ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) बुधवार दिनांक ३० मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे येथे काढण्यात आली होती. यानुसार दिनांक ४ एप्रिल २०२२ रोजी पोर्टलवर निवड यादी व प्रतिक्षा यादी घोषित करण्यात आली. निवड यादीतील व प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांना लघुसंदेश (SMS) देखील पाठविण्यात आलेले आहेत.

निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता ही मुदतवाढ अंतिम मुदतवाढ असल्याने पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी पडताळणी समिती व शाळेशी संपर्क साधून दिनांक १० मे २०२२ पूर्वी आपल्या पाल्याचा शाळेतील प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याद्वारे करण्यात आले आहे.

Recent Posts

अधिकाऱ्यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास होणार निलंबनाची कारवाई

मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…

6 minutes ago

दहशतवादी हल्ल्याने महाराष्ट्रावर पसरली शोककळा

डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…

15 minutes ago

CT Scan मुळे कर्करोग होऊ शकतो का? अमेरिकेतील एका नवीन अभ्यासात खुलासा

CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…

21 minutes ago

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंचा अ‍ॅक्शन मोड! अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी जम्मू-काश्मीरकडे रवाना

मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ…

46 minutes ago

NEET Student Suicide : ‘परीक्षा आणि कुटुंब जबाबदार नाहीत’ चिठ्ठी लिहित १८ वर्षीय विद्यार्थ्याने घेतला गळफास!

पटना : बिहारमधील एका नीटची (NEET) परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक…

1 hour ago

प्रत्येक नागरिकाला सुखरुप घरी परत आणणे हीच प्राथमिकता – अजित पवार

मुंबई : पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी…

1 hour ago