नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रणजी ट्रॉफीच्या नॉक-आउट सामन्यांच्या वेळापत्रकात बीसीसीआयने बदल केला आहे. ४ जूनपासून सुरू होणारे उपांत्यपूर्व फेरीचे सामने आता ६ जूनपासून सुरू होणार आहेत. अंतिम सामना २० जूनऐवजी २२ जूनला चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.
रणजी ट्रॉफीच्या नॉक-आउट सामन्यांच्या वेळापत्रकात केलेल्या बदलाचे कारण बीसीसीआयने स्पष्ट केलेले नाही. मात्र १९ जूनला चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी२० सामना खेळला जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
दरम्यान त्याच मैदानात रणजी ट्रॉफीचा अंतिम सामनाही खेळला जाणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने नॉक-आउट सामने पुढे ढकलले असल्याचे सूत्रांकडून समजते. बीसीसीआयने सर्व राज्यांच्या संघांना याबाबत सूचना दिल्या आहेत. नवीन वेळापत्रकानुसार आता उपांत्य फेरीचे सामनेही १२ जूनऐवजी १४ जूनपासून सुरू होणार आहेत. हे सामने बंगळूरमधील विविध स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत.
रणजी ट्रॉफीचे लीग स्टेज सामने आयपीएल सुरू होण्याआधी खेळले गेले होते. बंगाल, झारखंड, मुंबई, उत्तराखंड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेश या संघांनी स्पर्धेच्या नॉकआउट सामन्यांसाठी पात्र आहेत. दरम्यान ४ जूनपासून सुरू होणारे उपांत्यपूर्व फेरीचे सामने आता ६ जूनपासून सुरू होणार आहेत. अंतिम सामना २० जूनऐवजी २२ जूनला चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांनाही या सामन्यांची उत्सुकता आहे. तसेच खेळाडूही या सामन्यांसाठी सराव करत आहेत.
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…
डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…
CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…
मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ…
पटना : बिहारमधील एका नीटची (NEET) परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक…
मुंबई : पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी…