पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात भाजप पुन्हा आक्रमक

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात भाजप पुन्हा आक्रमक झाली असून लवकरच नालेसफाईच्या कंत्राटाबाबत भाजपकडून पोलखोल केली जाणार आहे.


२०१७ मध्ये शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेवर आल्यानंतर भाजपने पहारेकऱ्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेतील अनेक भ्रष्टाचार भाजपने समोर आणले. रस्ते कामातील अनियमितता, राणी बागेच्या कामातील अनियमितता तसेच बेस्टच्या निविदेमधील घोटाळा असे भ्रष्टाचार भाजप नेत्यांनी समोर आणले आहेत. दरम्यान नालेसफाईच्या कामांच्या पाहणीचे दौरेदेखील भाजपकडून करण्यात आले. नालेसफाईच्या कामात काय चुका होत आहेत? याबाबत भाजपने आयुक्तांना पत्र देखील दिले होते.


दरम्यान मुंबई महापालिकेवर आता सत्ताधाऱ्यांची सत्ता नसली तरी भाजप आपल्या पहारेकऱ्याच्या भूमिकेत आहे. ७ मार्च २०२२ ला महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाल संपल्यानंतर ८ मार्चला प्रशासक नियुक्त करण्यात आले. मात्र प्रशासक नियुक्त केल्यानंतरही भाजपने पालिकेवर आपले लक्ष ठेवले आहे.


त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आक्रमक झाली असून नालेसफाईच्या कामांची पाहणी केल्यानंतर पालिकेकडून देण्यात आलेल्या कंत्राटाबाबत भाजपकडून कागदपत्रे गोळा केली जात आहेत. तसेच कोणती कंत्राटे कोणत्या दराने देण्यात आली याबाबतही माहिती गोळा केली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप पालिकेतील भ्रष्टाचार समोर आणण्याच्या तयारीत आहे.

Comments
Add Comment

आरक्षणाची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडणार ?

मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन सुरू केले होते. जरांगेंचे आंदोलन

राज्यात नवीन २ लाख रोजगार संधी, ५० हजार कोटींची गुंतवणूक येणार

महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ सन २०५० पर्यंतचे

राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारण देत बिरेंद्र सराफ

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे आठ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत

या उद्योगपतीने घेतली पहिली टेस्ला !

मुंबई : आयनॉक्स ग्रुपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन हे भारतातील पहिले उद्योगपती ठरले आहेत, ज्यांनी ‘इंडिया

मुंबईकरांना दिलासा ! मुंबईत ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू – प्रवास होणार स्वस्त आणि सुलभ

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे . शहरात आता इलेक्ट्रिक बाईक