पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात भाजप पुन्हा आक्रमक

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात भाजप पुन्हा आक्रमक झाली असून लवकरच नालेसफाईच्या कंत्राटाबाबत भाजपकडून पोलखोल केली जाणार आहे.


२०१७ मध्ये शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेवर आल्यानंतर भाजपने पहारेकऱ्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेतील अनेक भ्रष्टाचार भाजपने समोर आणले. रस्ते कामातील अनियमितता, राणी बागेच्या कामातील अनियमितता तसेच बेस्टच्या निविदेमधील घोटाळा असे भ्रष्टाचार भाजप नेत्यांनी समोर आणले आहेत. दरम्यान नालेसफाईच्या कामांच्या पाहणीचे दौरेदेखील भाजपकडून करण्यात आले. नालेसफाईच्या कामात काय चुका होत आहेत? याबाबत भाजपने आयुक्तांना पत्र देखील दिले होते.


दरम्यान मुंबई महापालिकेवर आता सत्ताधाऱ्यांची सत्ता नसली तरी भाजप आपल्या पहारेकऱ्याच्या भूमिकेत आहे. ७ मार्च २०२२ ला महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाल संपल्यानंतर ८ मार्चला प्रशासक नियुक्त करण्यात आले. मात्र प्रशासक नियुक्त केल्यानंतरही भाजपने पालिकेवर आपले लक्ष ठेवले आहे.


त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आक्रमक झाली असून नालेसफाईच्या कामांची पाहणी केल्यानंतर पालिकेकडून देण्यात आलेल्या कंत्राटाबाबत भाजपकडून कागदपत्रे गोळा केली जात आहेत. तसेच कोणती कंत्राटे कोणत्या दराने देण्यात आली याबाबतही माहिती गोळा केली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप पालिकेतील भ्रष्टाचार समोर आणण्याच्या तयारीत आहे.

Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री