पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात भाजप पुन्हा आक्रमक

  60

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात भाजप पुन्हा आक्रमक झाली असून लवकरच नालेसफाईच्या कंत्राटाबाबत भाजपकडून पोलखोल केली जाणार आहे.


२०१७ मध्ये शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेवर आल्यानंतर भाजपने पहारेकऱ्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेतील अनेक भ्रष्टाचार भाजपने समोर आणले. रस्ते कामातील अनियमितता, राणी बागेच्या कामातील अनियमितता तसेच बेस्टच्या निविदेमधील घोटाळा असे भ्रष्टाचार भाजप नेत्यांनी समोर आणले आहेत. दरम्यान नालेसफाईच्या कामांच्या पाहणीचे दौरेदेखील भाजपकडून करण्यात आले. नालेसफाईच्या कामात काय चुका होत आहेत? याबाबत भाजपने आयुक्तांना पत्र देखील दिले होते.


दरम्यान मुंबई महापालिकेवर आता सत्ताधाऱ्यांची सत्ता नसली तरी भाजप आपल्या पहारेकऱ्याच्या भूमिकेत आहे. ७ मार्च २०२२ ला महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाल संपल्यानंतर ८ मार्चला प्रशासक नियुक्त करण्यात आले. मात्र प्रशासक नियुक्त केल्यानंतरही भाजपने पालिकेवर आपले लक्ष ठेवले आहे.


त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आक्रमक झाली असून नालेसफाईच्या कामांची पाहणी केल्यानंतर पालिकेकडून देण्यात आलेल्या कंत्राटाबाबत भाजपकडून कागदपत्रे गोळा केली जात आहेत. तसेच कोणती कंत्राटे कोणत्या दराने देण्यात आली याबाबतही माहिती गोळा केली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप पालिकेतील भ्रष्टाचार समोर आणण्याच्या तयारीत आहे.

Comments
Add Comment

राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक

मुंबईत सर्वाधिक, तर पुण्यात संख्येत घट मुंबई : कधीकाळी कुपोषित बालकांचा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या