मुंबई पालिकेत भ्रष्टाचार

  22

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपचे आमदार अमित साटम यांनी पुन्हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. मुंबई महापालिकेच्या निविदा प्रक्रीयेत केंद्रीय सतर्कता आयोगाच्या सिव्हीसी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरत मोठा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा आरोप साटम यांनी केला असून याबाबत सतर्कता आयोगाला पत्र दिले आहे.


दरम्यान निविदा इलेक्ट्रीक बस खरेदीच्या निविदा प्रक्रीयेत बोलीदारांसाठी दि. २५ एप्रील २०२२, सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती; परंतु याच दिवशी ३ वाजून ३५ मिनीटाला अचानकपणे शुद्धीपत्रक काढण्यात आले आणि यात निविदा भरण्यासाठी बोलीदारांच्या/कंत्राटदारांच्या पात्रता अटीच बदलण्यात आल्या होत्या, तर बदललेल्या पात्रता अटीत विदेशी कंपन्या आणि विदेशातील पात्रता अनुभवही ग्राह्य धरण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही अट अचानकपणे बदलणे कायदेशीर नाही. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे अमित साटम म्हणाले. मात्र यामुळे संपूर्ण निविदा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले.


एका विशिष्ट परदेशी कंपनीला किंवा तसा अनुभव असणाऱ्या कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी राबवलेली निविदा प्रक्रीया असल्याचा आरोप करत तातडीने आपण ही निविदा प्रक्रीया रद्द करण्याचे आदेश देऊन सदरील प्रक्रीयेतील अनियमिततांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी. व नव्याने व पारदर्शकपणे निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना द्याव्यात, असे अमीत साटम यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर