श्रीभालचंद्र महाराजांचे भाविक भक्त अनेक आहेत. परंतु काया, वाचा, मने त्यांची निस्सीम सेवा करणारे, त्यांच्या चरणी लीन होणारे जे काही मोजकेच भक्त आहेत, सेवक आहेत त्यात मुंबईतील समर्थ औषधालयाचे मालक ह.भ.प. श्रीधर यशवंत रेवंडकर व त्यांच्या पत्नी सौ. सुरजप्रभा या होत. मुंबईत श्रीबाबांचे दुसरे परम भक्त म्हणजे जे मनाने, कृतीने आणि प्रकृतीने विशाल आहेत. किंबहुना ज्यांच्या श्वासोच्छ्वासातूनही ‘हरि ॐ’ चा मंत्र चालू असतो असे थोर उद्योगपती ह.भ.प. हरि ॐ पांडुरंग बाळाजी बागवे हे होत. ‘लहानपण देगा देवा.’ या श्री तुकोबांच्या महान शिकवणुकीचे ते नेहमीच योग्य पालन समाजात वावरत असतात.
श्रीबाबांचे त्यांना फार आकर्षण आहे. कोल्हापूरचे शांताराम कृष्णाजीपंत वालावलकर यांचे सारखेही आणखी श्रीबाबांचे परम भक्त आहेत. सौजन्यमूर्ती बापूसाहेबांनी श्रीबाबांच्या कार्यास बराच हातभार लावला आहे. याशिवाय संबंध महाराष्ट्रांत व इतरही त्यांचे लहान थोर अनेक भक्त आहेत.
– राजाधिराज श्री भालचंद्र महाराज की जय!
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…