पालकमंत्री बच्चू कडूंवर गुन्हा दाखल

  30

अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या तक्रारीनंतर राज्यमंत्री तसेच अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला न्यायालयाच्या आदेशानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी हे गुन्हा दाखल केला आहे. कलम ४०५, ४०९, ४२०, ४६८ आणि ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून काही कलम अजामीनपात्र असल्याने बच्चू कडूंच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.


वंचित बहुजन आघाडीने बच्चू कडू यांच्यावर अकोला जिल्ह्यातील तीन रस्ते कामांत १ कोटी ९५ लाखांच्या आर्थिक अपहाराचा आरोप केला होता. पालकमंत्र्यांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांच्या कामांना मंजूरी दिल्याचा गंभीर आरोप वंचितने केला होता. वंचितच्या पाठपुराव्यानंतर बच्चू कडूंवर आर्थिक अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वंचितने यासंदर्भात राज्यपालांकडेही कारवाईसाठी परवानगी मागितली होती. न्यायालयाने या प्रकरणात अपहार झाल्याचे प्राथमिक मत नोंदवत गुन्हा दाखल करण्याचे आदेश सिटी कोतवाली पोलिसांना दिले होते.


जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शिफारस केलेली रस्त्यांची कामे पालकमंत्री कडूंनी डावलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला डावलत आपल्या मर्जीतील रस्त्यांची कामे नियमबाह्यपणे करवून घेतल्याचा आरोप वंचितने केला. यातील दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे त्यांनी सादर केले होते. यात जिल्हा परिषदेच्या अधिकारावर पालकमंत्र्यांनी अतिक्रमण केल्याचे वंचितने म्हटले होते. यात रस्त्यांचे 'ग्रामीण मार्ग क्रमांक' नसतांना कामांना प्रशासकीय मान्यता कशी मिळू शकते, असा सवाल वंचितने केला होता. दरम्यान, वंचितच्या तक्रारीनंतर अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरांनी या तीन रस्त्यांसह २५ कामांना स्थगिती दिली होती.


सर्वच कलम अजामीनपात्र, काही कलमात ७ वर्ष शिक्षा


१) ४०५- सरकारी पैशांची अपव्याची व्याख्या, ३ वर्ष शिक्षा


२) ४०९,- सरकारी पैशांचा अपव्यय, १० वर्ष, जन्मठेप


३) ४२०,- फसवणूक, ७ वर्ष शिक्षा


४) ४६८, - पुराव्याशी छेडछाड करणे


५) ४७१,- खोटं कागदपत्र खरे दाखवणे, ३ वर्ष शिक्षा.

Comments
Add Comment

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची

पुण्यात दिसले इराणचे झेंडे आणि खामेनेईंचे पोस्टर

पुणे : इस्रायल - इराण दरम्यान युद्धबंदी झाल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले असले तरी दोन्ही देशांमध्ये तणाव कायम

आमदाराची मुलगी शासकीय आश्रम शाळेत शिकणार !

गडचिरोली : आजच्या काळात सर्व पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देण्याच्या तयारीत असतात ,