एसी लोकलच्या प्रवासी संख्येत झाली दुपटीने वाढ

  21

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरमध्ये उष्णतेत वाढ झाली आहे. दरम्यान उन्हापासून बचाव करण्यासाठी मुंबईकर एसी लोकलने प्रवास करत आहेत. त्यामुळे एसी लोकलच्या प्रवासी संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. सध्या दररोज सरासरी मध्य रेल्वेवर १९ हजार, तर पश्चिम रेल्वे मार्गावर २१ हजार प्रवासी एसी लोकलमधून प्रवास करत आहे.


यंदा मध्य रेल्वेवर एसी लोकल फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आलेल्या आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी, २०२२ मध्ये मध्य रेल्वेच्या एसी लोकलमधून प्रति दिवस ७ हजार ८८३ प्रवासी प्रवास करत होते, तर फेब्रुवारी महिन्यात एसी लोकलची प्रवासी संख्याही ११ हजार २२९ वर जाऊन पोहपचली आहे. याशिवाय गेल्या महिन्यात दररोज १५ हजार ३५७ प्रवासी एसी लोकलमधून प्रवास करत होते. मात्र, गेल्या महिन्यापेक्षा एप्रिल महिन्यात उष्णता प्रचंड वाढली आहे.


त्यामुळे दररोज मध्य रेल्वेवर १९ हजार ३३२, तर पश्चिम रेल्वे मार्गावर २१ हजार ७८५ प्रवासी एसी लोकलमधून प्रवास करत आहेत. रेल्वेचा थंडगार प्रवास मिळण्यासाठी एसी लोकल सुरू केली. मात्र कमी फेऱ्या आणि जास्त भाडे यामुळे प्रवाशांनी एसी लोकलला पाठ दाखविली. पीक अव्हरमध्ये कोणी एसी लोकलमध्ये चढत नव्हते. त्यामुळे रिकाम्या एसी लोकल धावत होत्या. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून एसी लोकलला चांगली पसंती मिळत आहे.


तर दर सोमवारी एसी लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सध्या एसी लोकलच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, टिटवाळा या सेक्शनमध्ये ४४ फेऱ्या, हार्बरच्या सीएसएमटी ते पनवेल ८ फेऱ्या, पश्चिम हार्बर मार्गावर सीएसएमटी ते गोरेगाव ८ फेऱ्या, अशा ६० फेऱ्या चालविण्यात येत आहेत.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता