२५ हजाराची लाच घेताना शिक्षणाधिकारी सापडला

  65

पालघर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांना एका शिक्षिकेकडून २५ हजारांची लाच घेताना पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. याप्रकरणी वादग्रस्त शिक्षणाधिकारी लता सानप यांना पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षकाची बदली करण्यासाठी ही लाच मागितली असल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. या घटनेमुळे पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागली असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरु आहे.


पालघरमध्ये शिक्षणाधिकारी लता सानप यांच्या विरोधात अनेक तक्रारी करून त्यांची बदली करावी, यासाठी अविश्वासाचा ठराव जिल्हा परिषदेच्या सभेत घेण्यात आला होता व तो मंजूर झाला होता. जिल्ह्यातील एका शिक्षिकेची बदली करण्यासाठी शिक्षणाधिकारी लता सानप यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर सानप यांच्या घरात २५ हजारांची लाच घेताना त्यांना ताब्यात घेतले असल्याचे लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Crizac Limited IPO: उद्यापासून Crizac आयपीओ बाजारात दाखल होणार Price Band २३३ ते २४५ रूपये निश्चित!

प्रतिनिधी: उद्यापासून क्रिझॅक लिमिटेड (Crizac Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहे. ८६० कोटींचा

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत