माझ्यावरील हल्ला ठाकरे सरकार स्पॉन्सर्ड

  25

मुंबई (प्रतिनिधी) : ‘माझ्यावर झालेला हल्ला हा ठाकरे सरकारकडून स्पॉन्सर हल्ला होता’, अशी थेट टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.


इतकेच नाहीतर यावेळी त्यांनी पोलिसांवरही आरोप केले आहेत. ‘पोलिसांच्या संगनमताने हा हल्ला झाला आहे. तर माझ्या नावाची खोटी एफआयआर माझ्या सहीसह संजय पांडे यांनी दिली असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे. माझी एफआयआर लिहून का घेतली नाही?’, असाही सवालही यावेळी त्यांनी केला.


दरम्यान, ठाकरे सरकारने माझा मनसुख हिरेन करायचा प्लॅन आखला होता. पण देव आणि मोदी सरकारच्या कृपेमुळे माझा जीव वाचला. काल शिवसैनिकांनी फेकलेला दगड जरा वरती लागला असता तर मी कायमचा आंधळा झालो असतो, असे वक्तव्य सोमय्या यांनी केले.


पोलिसांनी मला गुंडांच्या हवाली केले


‘मी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री साडेनऊ वाजता येणार असल्याचे अगोदरच कळविले होते. त्यानुसार शिवसेनेचे ७० ते ८० गुंड अगोदरच पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. काहीजण पोलीस स्टेशनच्या आवारात उभे होते. आतमध्ये जातानाही त्यांनी मला शिवीगाळ केली. पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर मी बाहेर पडण्यापूर्वी माझ्यावर हल्ला होऊ शकतो, असे त्यांना सांगितले होते. मात्र, पोलिसांनी आम्ही शिवसैनिकांना दूर नेले आहे, सगळी चोख व्यवस्था केली आहे, असे सांगितले. मात्र, पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच पोलिसांनी मला शिवसेनेच्या गुंडांच्या हवाली केले. या हल्ल्यासाठी पोलीस आयुक्त संजय पांडे हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. शरद पवार असोत, अजित पवार, वळसे-पाटील असो किंवा संजय राऊत असो किंवा ठाकरे सरकार हे सगळे गुंडगिरी करतात. दादागिरी करतात घोटाळे करतात, त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागावी’, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

मीरा भाईंदर पोलिस आयुक्तांची तडकाफडकी बदली, मोर्चा प्रकरण भोवलं

मिरा भाईंदर: मिरा भाईंदरमध्ये काल (८ जुलै) संपन्न झालेला  मराठी भाषिक मोर्चा होऊ न देण्यासाठी पोलिसांनी सर्वात

Ashish Shelar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत पारदर्शकता आणू : मंत्री आशिष शेलार

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेची प्रक्रिया आँनलाईन व

Dada Bhuse : खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई होणार : शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यातील काही शाळांनी शासकीय लाभ आणि विशेष सवलती मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर करून ‘अल्पसंख्यांक’

Devendra Fadanvis : पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; SDRF आणि NDRF यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री

नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन मुंबई : मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात

Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad : आमदार गायकवाड बनियान-टॉवेलवर येतो अन् कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याची धुलाई; देवेंद्र फडणवीस म्हणाले, कारवाई...

मुंबई : नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तवणूक आमदार

'जेएनपीटी आणि वाढवन बंदर प्राधिकरणांसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता' – मंत्री नितेश राणे

* परदेशी पतसंस्था १२० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार * बंदरे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण