मुंबई (प्रतिनिधी) : “ही राजकीय लढाई राहिलीच नाहीये. इथे गँगवॉर सुरू झाला आहे. अघोषित गँगवॉर आहे हा. तुम्हाला दाऊद, छोटा शकील या लोकांना बाहेर काढायचे होते. आता शिवसेनेच्या निमित्ताने तुम्हाला मुंबईत गँगवॉर सुरू करायचेय का? आणि आम्ही काय बघत बसायचे का? असा सवाल करत, चालणार नाही”, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे?
आमदार नितेश राणे यांनी या सर्व घडामोडींवर प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला. शनिवारी राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्यापासून माघार घेतल्यावर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर खार पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक झाली.
ते म्हणाले, आज रस्त्यावरची लढाई सुरू झाली आहे. खार पोलीस स्टेशनसमोर काँक्रीटची वीट सोमय्यांवर टाकली जाते. तर पोलीस काय करत होते. उद्या शिवसेनेच्या दिशेने, वरुण सरदेसाईंच्या दिशेने, आदित्य ठाकरेंच्या दिशेने दगड यायला लागले, तर काय करणार तुम्ही? आम्ही विचारांची लढाई विचारांनी लढू. दगडाची भाषा दगडाने करू, पण आम्हाला राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची नाहीये. असेही राणे म्हणाले.
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…