शहापूरमधील पाणीटंचाई सोडविण्यासाठी अमृतकुंभ, मोती, बोडद धरणांची मागणी...

  59

ठाणे( प्रतिनिधी): शहापूर तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई सोडण्यासाठी अनेक वर्षांपासून रखडलेले घाटनदेवी येथील अमृतकुंभ जलसागर धरण, बेंडेकोन येथील मोती लघु धरण आणि पेंढरी कलमगाव येथील बोडद लघु धरण उभारावे, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील व जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे. या मागणीवर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.


मुंबई-ठाणे शहराची तहान भागविणारा तालुका म्हणून शहापूरची ओळख आहे. शहापूर तालुक्यातच भातसा, तानसा आणि मोडकसागर धरणे आहेत. मात्र, तालुक्याचा खर्डी परिसर, वाशाळा, तलवाडा-डोळखांब, कसारा-मोखावणे, आटगाव, कळमगाव, पेंढरघोळ, किन्हवली आदी परिसरासह तालुक्यातील ग्रामीण भागाला दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

गेल्या अनेक वर्षांपासून शहापूर तालुक्यात घाटनदेवी येथील अमृतकुंभ जलसागर धरण, बेंडेकोन येथील मोती लघु धरण आणि पेंढरी कलमगाव येथील बोडद लघु धरण उभारण्याची मागणी केली जात आहे. मात्र, त्याबाबत सरकारी यंत्रणांकडून दखल घेण्यात आलेली नाही, असे आमदार डावखरे यांनी पत्रात म्हटले आहे. यावेळी भाजपाचे गटनेते विवेक नार्वेकर यांचीही उपस्थिती होती.

शहापूरात उत्तरेकडील दक्षिण बाजूला आणि कसारा घाट रस्त्याच्या डावीकडील खोऱ्यात पाच ते सात दऱ्यांमध्ये अमृतकुंभ जलसागर धरण उभारता येऊ शकेल. प्रस्तावित धरणाचा परिसर शहापूर तालुक्याच्या २०० ते ५०० मीटर उंच भूभागावर असल्यामुळे गुरुत्वाकर्षण पद्धतीने गावांना सहजपणे पाणीपुरवठा करता येऊ शकेल. प्रस्तावित अमृतकुंभ धरण क्षेत्रातील जमीन वन विभागाच्या मालकीची असून, धरणाच्या परिसरात एकही गाव वसलेले नाही. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्नही निर्माण होणार नाही.

अमृतकुंभबरोबरच मोती व बोडद लघु धरणही उभारता येणे शक्य आहे. तालुक्यात दरवर्षी होणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी तिन्ही धरण उभारण्याची आवश्यकता आहे, असे आमदार डावखरे यांनी पत्रात म्हटले आहे.

Comments
Add Comment

ठाण्यात ८० हजार कुटुंबांचे धोकादायक इमारतींत वास्तव्य

इमारती रिकाम्या करण्यास रहिवाशांचा विरोध ठाणे : विरारमध्ये इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची

Raj Thackeray on Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज ठाकरे यांचे सूचक वक्तव्य, म्हणाले...

ठाणे: मराठा आरक्षणाच्या विषयावरुन मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. आज त्यांच्या

गणेशमूर्तींचा बोटीने प्रवास, भिवंडीकरांचा कोंडीवर उपाय

भिवंडी (प्रतिनिधी) : वाहतूक कोंडीचे विघ्न बाप्पांच्या मार्गातही येत आहे. वाहतूक कोंडीचा त्रास ठाणे जिल्ह्यातील

Eknath Shinde: रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या बाईकस्वाराच्या मदतीला धावले उपमुख्यमंत्री, ताफा थांबवून केली मदत

ठाणे: आज सगळीकडे गणेशोस्तवाची धूम सुरू असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर एक अपघात घडला. एक

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या