महाराष्ट्राचा समृद्ध राजकीय वारसा जपा; उच्च न्यायालयाचे ठाकरे सरकारला खडेबोल

Share

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचा समृद्ध राजकीय वारसा जपा! असे खडेबोल ठाकरे सरकारला सुनावत उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलासा दिला आहे. धुळे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पोलिसांना कठोर कारवाईसह आरोपपत्र दाखल करण्यापासून मज्जाव करण्याचे आदेश देण्याची मागणी नारायण राणेंनी केली होती.

यानंतर कोर्टाने नारायण राणे यांना दोन आठवडे अटकेपासून अंतरिम दिलासा दिला असून तसे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने नारायण राणेंविरोधात कारवाई न करण्याची हमी देण्यास कोर्टात नकार दिला. यानंतर हायकोर्टाने यांना दोन आठवडे अटकेपासून अंतरिम दिलासा देत
तसे आदेश दिले.

राजकीय विचारधारा आणि समजुतींमधील मतभेद हे राजकीय विरोधकांमधील सौहार्दपूर्ण संबंधांच्या आड येऊ नयेत. महाराष्ट्र हे समृद्ध राजकीय वारसा लाभलेले राज्य आहे; तो जपा, असे बोल उच्च न्यायालयाने गुरुवारी सत्ताधारी आणि विरोधकांना सुनावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी धुळ्य़ात दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने परखड मत मांडले.

Recent Posts

पावसाळी आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज

प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आराखडा तयार मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अमलबजावणीसाठी प्रशासकीय…

1 minute ago

CSK vs SRH, IPL 2025: धोनीच्या संघाची खराब कामगिरी सुरूच…हैदराबादचा ५ विकेट राखत विजय

चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…

1 day ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २६ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…

1 day ago

नाले व कचरा सफाई ; केवळ कागदावरच नसावी

पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…

1 day ago

मराठवाडा तहानलेलाच

मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…

1 day ago

बंद घरे मोकळा श्वास घेऊ लागली

रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…

1 day ago