नवी दिल्ली : भारतातील कोरोना संसर्गात मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात २ हजार ५२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल देशात कोरोनाचे २,३८० नवे रुग्ण सापडले होते आणि ५६ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ७९ इतकी झाली आहे.
शुक्रवारी दिवसभरात देशात 1656 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 17 हजार 724 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.03 टक्के इतका आहे.
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 187 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी दिवसभरात देशात 19 लाख 13 हजार 296 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 187 कोटी 46 लाख 72 हजार 536 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.