नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई विरोधात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
दाऊदच्या हस्तकाशी संबंधित सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध आहे, या आरोपावरून ईडीने त्यांना २३ फेब्रुवारीला अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड कारागृहात आहेत. दरम्यान ईडीने मलिक यांच्या विविध मालमत्तांवर जप्ती केली.
एकूणच या सर्व कारवाई विरोधात आणि अंतरिम जामीनासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. मलिक यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाची नोंद घेऊन सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज, शुक्रवारी सुनावणी झाली. यात सध्या तपास सुरू असल्याने हस्तक्षेप करणं योग्य नाही, असे सांगत सदर अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे मलिकांना आणखी काही काळ कोठडीतच राहावे लागणार आहे.
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…
मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…