संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत ४९ प्रकरणे मंजूर

नवीन पनवेल (वार्ताहर) : पनवेल तालुक्यासाठी संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने समितीच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक २० एप्रिल रोजी तहसीलदार कार्यालय पनवेल येथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीसाठी उपस्थित असलेल्या नवनियुक्त समितीचे अध्यक्ष दर्शन ठाकूर व सदस्य तसेच शासकीय सदस्य यांचे प्रशासनाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.


विशेष सहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य योजना, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य इत्यादी योजनांबाबत एकनाथ नाईक, नायब तहसीलदार, तथा आहरण व संवितरण अधिकारी, संजय गांधी योजना यांनी माहिती देऊन कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यानंतर संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष दर्शन ठाकूर व सदस्य तसेच शासकीय सदस्य सचिव तथा तहसिलदार पनवेल, शासकिय सदस्य, संजय भोये, गटविकास अधिकारी, पंचायत समिती पनवेल, यांच्या उपस्थितीत समितीची बैठक होऊन, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना इत्यादी लाभार्थ्यांच्या प्रकरणांना मंजूरी देण्यात आलेली आहे.


संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत ४९ प्रकरणे मंजूर करण्यात आली, तर केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अंतर्गत एकूण ४ प्रकरणे मंजूर करण्यात आली. वरील प्रकरणात प्रति महिना रक्कम रुपये १ हजार ते १ हजार २०० मिळून एकूण रक्कम रुपये ५२ हजार ४००, तसेच केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना एकूण ४ प्रकरणे ८० हजार, असे एकूण १ लाख ३२ हजार ४०० इतके अनुदान लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

पाण्याची गळती आणि दुषित पाणी समस्येवर लक्ष द्या, आयुक्तांचे जल अभियंता विभागाला निर्देश

मुंबई : मुंबई उत्तर मुंबईतील पाण्याच्या समस्येबाबत महापालिका आयुक्तांसोबतच लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या

मुंबई आशियातील 'आनंदी' शहर!

टाइम आऊट सर्वेक्षणात पहिले स्थान; ८७% नागरिक खूश नवी दिल्ली: मुंबईला २०२५ साठी आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून

गोराईत उभारले जाणार भारतातील पहिले मॅग्रोव्ह पार्क

उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या पुढाकाराने साकारणार प्रकल्प मुंबई : भारतातील पहिले ‘मॅंग्रोव्ह-थीम

अमिताभ बच्चन यांनी विकले २ आलिशान फ्लॅट्स; १२ कोटींना झाला व्यवहार

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव येथे असलेले त्यांचे दोन लक्झरी फ्लॅट्स विकले

मुंबई महापालिकेचे प्रभाग आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर रोजी वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने ५ जणांना चिरडले!

मस्जीद बंदर रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना, रेल्वे कर्मचा-यांच्या आंदोलनाने घेतले बळी, दोष कुणाचा? मुंबई :