संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत ४९ प्रकरणे मंजूर

नवीन पनवेल (वार्ताहर) : पनवेल तालुक्यासाठी संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने समितीच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक २० एप्रिल रोजी तहसीलदार कार्यालय पनवेल येथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीसाठी उपस्थित असलेल्या नवनियुक्त समितीचे अध्यक्ष दर्शन ठाकूर व सदस्य तसेच शासकीय सदस्य यांचे प्रशासनाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.


विशेष सहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य योजना, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य इत्यादी योजनांबाबत एकनाथ नाईक, नायब तहसीलदार, तथा आहरण व संवितरण अधिकारी, संजय गांधी योजना यांनी माहिती देऊन कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यानंतर संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष दर्शन ठाकूर व सदस्य तसेच शासकीय सदस्य सचिव तथा तहसिलदार पनवेल, शासकिय सदस्य, संजय भोये, गटविकास अधिकारी, पंचायत समिती पनवेल, यांच्या उपस्थितीत समितीची बैठक होऊन, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना इत्यादी लाभार्थ्यांच्या प्रकरणांना मंजूरी देण्यात आलेली आहे.


संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत ४९ प्रकरणे मंजूर करण्यात आली, तर केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अंतर्गत एकूण ४ प्रकरणे मंजूर करण्यात आली. वरील प्रकरणात प्रति महिना रक्कम रुपये १ हजार ते १ हजार २०० मिळून एकूण रक्कम रुपये ५२ हजार ४००, तसेच केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना एकूण ४ प्रकरणे ८० हजार, असे एकूण १ लाख ३२ हजार ४०० इतके अनुदान लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र