घणसोलीतील भाजी मार्केट अन्यत्र हलवल्याने मनसे आक्रमक

नवी मुंबई (प्रतिनिधी) : घणसोली येथील साई सदानंद व गणेश नगर परिसरात असलेला भाजी बाजार एका बाजूला व्यवस्थितरीत्या बसविलेला होता. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही समस्या उद्भवत नव्हत्या; परंतु मंगळवारी अचानक पालिकेकडून सुस्थितीत बसविलेले भाजी मार्केट पुन्हा रस्त्याच्या कडेला बसविले गेल्यामुळे नागरी समस्या वाढल्या आहेत. म्हणून भाजी मार्केट जेथे होते, त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यासाठी नवी मुंबई मनसे व काही सामाजिक संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.


साई सदानंद नगर व गणेश नगरमधून डी-मार्टकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला भाजी मार्केट भरत होते. यामुळे वाहतुकीची समस्या, नागरिकांच्या गर्दीने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. तसेच अपघातही झाले होते. म्हणून भाजपचे पदाधिकारी गणेश सकपाळ व त्यांच्या पथकाने महिन्यांपूर्वी पालिकेच्या सहकार्याने रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या जागेवर योजनाबद्ध व कुणावरही अन्याय होणार नाही, हा दृष्टिकोन ठेवून पालिकेच्या अनुमतीने भाजी मार्केटचा एक प्रकारे पुनर्विकास केला.


यामुळे रस्त्यावर होणाऱ्या समस्या एका मिनिटात समाप्त झाल्या. यामुळे स्थानिक नागरिक, पादचारी, ग्राहक व व्यावसायिक आनंदात होते; परंतु मंगळवारी सायंकाळी पालिका प्रशासनाने पोलीस फौजफाटा, सुरक्षा रक्षकासह भाजी मार्केटचा ताबा घेतला. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व संताप पाहायला मिळाला.


रस्त्याच्या कडेला बाजार असल्याने नागरिकांना फारच त्रास होत होता. अपघाताच्या घटनादेखील घडल्या होत्या. म्हणून येथील शेकडो नागरिकांनी सूचना केल्या होत्या. त्यामुळे पालिकेच्या कानावर घालून सुरक्षित जागेवर भाजी मार्केट बसविले होते. - गणेश सकपाळ, भाजप पदाधिकारी, नवी मुंबई


येत्या तीन दिवसांत पालिकेने ज्या ठिकाणी बाजार सुरक्षितरीत्या बसविला होता. त्याच ठिकाणी बसवावा. नाहीतर मनसे स्टाईलने कार्यवाही करण्यात येईल आणि त्याला जबाबदार पालिका प्रशासन असेल.
- संदीप गलगुडे, संघटक, मनसे-नवी मुंबई

Comments
Add Comment

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Devendra Fadnavis BMC Election 2026 : उद्धव आणि राज ठाकरेंचा जीव फक्त मुंबईतच का अडकलाय? फडणवीसांनी पुराव्यासह काढला भ्रष्टाचाराचा पाढा, नक्की काय म्हणाले?"

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

मुंबई  : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे

Nitesh Rane : नालासोपारा मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रचार सभांचा झंझावात!

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील

भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये