घणसोलीतील भाजी मार्केट अन्यत्र हलवल्याने मनसे आक्रमक

नवी मुंबई (प्रतिनिधी) : घणसोली येथील साई सदानंद व गणेश नगर परिसरात असलेला भाजी बाजार एका बाजूला व्यवस्थितरीत्या बसविलेला होता. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही समस्या उद्भवत नव्हत्या; परंतु मंगळवारी अचानक पालिकेकडून सुस्थितीत बसविलेले भाजी मार्केट पुन्हा रस्त्याच्या कडेला बसविले गेल्यामुळे नागरी समस्या वाढल्या आहेत. म्हणून भाजी मार्केट जेथे होते, त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यासाठी नवी मुंबई मनसे व काही सामाजिक संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.


साई सदानंद नगर व गणेश नगरमधून डी-मार्टकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला भाजी मार्केट भरत होते. यामुळे वाहतुकीची समस्या, नागरिकांच्या गर्दीने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. तसेच अपघातही झाले होते. म्हणून भाजपचे पदाधिकारी गणेश सकपाळ व त्यांच्या पथकाने महिन्यांपूर्वी पालिकेच्या सहकार्याने रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या जागेवर योजनाबद्ध व कुणावरही अन्याय होणार नाही, हा दृष्टिकोन ठेवून पालिकेच्या अनुमतीने भाजी मार्केटचा एक प्रकारे पुनर्विकास केला.


यामुळे रस्त्यावर होणाऱ्या समस्या एका मिनिटात समाप्त झाल्या. यामुळे स्थानिक नागरिक, पादचारी, ग्राहक व व्यावसायिक आनंदात होते; परंतु मंगळवारी सायंकाळी पालिका प्रशासनाने पोलीस फौजफाटा, सुरक्षा रक्षकासह भाजी मार्केटचा ताबा घेतला. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व संताप पाहायला मिळाला.


रस्त्याच्या कडेला बाजार असल्याने नागरिकांना फारच त्रास होत होता. अपघाताच्या घटनादेखील घडल्या होत्या. म्हणून येथील शेकडो नागरिकांनी सूचना केल्या होत्या. त्यामुळे पालिकेच्या कानावर घालून सुरक्षित जागेवर भाजी मार्केट बसविले होते. - गणेश सकपाळ, भाजप पदाधिकारी, नवी मुंबई


येत्या तीन दिवसांत पालिकेने ज्या ठिकाणी बाजार सुरक्षितरीत्या बसविला होता. त्याच ठिकाणी बसवावा. नाहीतर मनसे स्टाईलने कार्यवाही करण्यात येईल आणि त्याला जबाबदार पालिका प्रशासन असेल.
- संदीप गलगुडे, संघटक, मनसे-नवी मुंबई

Comments
Add Comment

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र