फणसवाडी गावात पाणीटंचाई कायम

  116

मुरुड (वार्ताहर) : फणसावाडी गावात देश स्वतंत्र होऊनही ७४ वर्षे झाली, तरीही गावातील पाण्याचा प्रश्न काही सुटत नाहीत. त्यामुळे या गावातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार कधी, लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे लक्ष देणार कधी, असे अनेक सवाल येथील ग्रामस्थांना पडले आहेत.


मुरूडच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गारंबीपासून नजीक रोहा तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या भालगाव ग्रामपंचायत हद्दीतील फणसवाडी गावात पाणीटंचाई कायम आहे. देश स्वतंत्र झाला तरी या गावाकडे लोकप्रतिनिधींनी कायमच दुर्लक्ष केले आहे. हे गाव डोंगराळ प्रदेशातील दुर्गम भागात वसले आहे. सुमारे १०० लोकसंख्या वस्तीचे हे गाव आहे. या गावातील ग्रामस्थांनी पाण्यासाठी विहीर बांधलेली आहे. ही विहीर डोंगर भागात असल्याने या विहिरीला पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असते. तथापि, फेब्रुवारीनंतर या विहिरीतील पाणी आटल्याने गावातील ग्रामस्थांना बैलगाडीने दोन मैल अंतरावरून गारंबीहून पाणी आणावे लागते.


तसेच महिलांना तीन किलोमीटरची पायपीट करून डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागते. हे गाव दुर्गम भागात असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी कायम काणाडोळा करत आले आहेत, असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.


‘डोक्यावरील हंडा उतरवावा’


या गावातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार कधी, महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार कधी, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे लक्ष देऊन या गावातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा सोडवावा व महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवावा, अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

Comments
Add Comment

मुंबई गोवा महामार्गावरील माणगावसह इंदापूर बायपासचे काम तातडीने सुरू होणार

खासदार सुनील तटकरे यांचे आश्वासन माणगाव : मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम

माथेरान पर्यटनस्थळी वाहतूक कोंडीचा तिढा सुटणे आवश्यक

विकेंडला दस्तुरी नाक्यावर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करणे गरजेचे माथेरान: दर विकेंडला माथेरानमध्ये

अखेर मुरुड आगारात पाच नवीन लालपरी दाखल

नांदगाव मुरुड : मुरुड या पर्यटन स्थळी एस टी आगारात जीर्ण झालेल्या बसेस मुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये तीव्र

एसटी बसच्या एक्सलचे नट लुज; चालकांनी चालवली बस

श्रीवर्धन : मुंबईवरून बोर्लीकडे आलेली बस बोर्लीवरून आदगाव, सर्वे तसेच दिघीकडे मार्गस्थ होत असताना बोर्ली येथील

जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या पारदर्शकतेसाठी मेरी पंचायत अ‍ॅप

एका क्लिकवर ग्रामस्थांच्या कारभाराची माहिती अलिबाग : केंद्र व राज्य सरकारने ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर

कशेडी घाटातील जुन्या राष्ट्रीय महामार्गावर भेगा

संबंधित अधिकाऱ्यांसह तहसीलदारांकडून पाहणी पोलादपूर : जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या