आता माथेरानचे पाणी महागले

कर्जत (वार्ताहर) : देशातील सर्वात महाग पाणीदर माथेरानमध्ये आहे. येथे घरगुती वापरासाठी ४८ रुपये, संस्थांना ६२ रुपये, तर हॉटेल्सना १६२ रुपये दर आकारला जात आहे. हे दर कमी करण्यासाठी प्राधिकरणाला आर्थिक पॅकेज देण्याच्या मागणीचे निवेदन माथेरान महिला काँग्रेसने आमदार महेंद्र थोरवे यांना दिले. निवेदन दिले असल्याचे शिवाजी शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे माथेरानचे पाणी महाग झाल्याने पर्यटकांच्या घशाला कोरड पडली आहे.


मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले माथेरान हे सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शहराला पाणीपुरवठा करते. यासाठी नेरळ येथून उल्हासनदीचे पाणी अडीच हजार फूट उंचीवर पंप करून पुरवठा केला जातो. सदर पाणीपुरवठा स्कीमवर होणाऱ्या खर्चाच्या आधारे पाण्याचे दर प्राधिकरण निश्चित करते. घरगुती वापराचे दर तीन टप्प्यांत आकारले जातात. पाण्याचा दर १००० लिटरमागे निश्चित केला आहे. ० ते १५००० लीटर वापरासाठी रुपये २४.२०, यापुढील वापरासाठी २५००० लीटरपर्यंत असल्यास रुपये ३६.२० व २५००० लीटरच्या पुढील वापरासाठी रुपये ४८.७० इतका आहे. शाळा व इतर संस्थांसाठी रुपये ६२, हॉटेल्स सी क्लास रु. १०७.२०, बी क्लास रु. १२८.५०, ए क्लास हॉटेल्स रु. १६२.४० असा दर आहे.


मुंबई शहरालाही नाशिक, ठाणे जिल्ह्यातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र मुंबई पालिका चाळी व झोपडपट्ट्यांना रु. ४ व उच्चभ्रू हाऊसिंग सोसायट्यांना रु. ५.२० या दराने पाणीपुरवठा करते. या प्रचंड महाग दारातून दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकारने दर वर्षी दीड ते दोन कोटी रुपयांची आर्थिक मदत प्राधिकरणाला करावी, अशी मागणी माथेरान शहर महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा वर्षा शिंदेंनी केली आहे.


वेळेत पाण्याच्या दरात बदल न केल्यास नक्कीच पर्यटकांवर परिणाम होणार आहे. याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे निवेदन दिले असून यावर त्यांनी योग्य तो मार्ग काढण्यात यावा.


- शिवाजी शिंदे, माजी नगरसेवक, माथेरान नगरपालिका

Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे