मुंबई (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात शांततेत आंदोलन सुरू असताना अचानक कर्मचाऱ्यांच्या एका गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पेडर रोड येथील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावर हल्ला केल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता तपासाला वेग आला असून तपासातून रोज नव्या धक्कादायक बाबी समोर येत आहेत. पवारांच्या घरावर चाल करून जाणारे काही आंदोलक हे दारूच्या नशेत होते, असा संशय व्यक्त होत होता. त्यावरून रक्ताचे नमुने तपासण्यात आले असता त्यातील ११ जणांच्या रक्तनमुन्यात अल्कोहोल आढळून आले आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत एकूण ११६ जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या अानुषंगाने शुक्रवारी महत्त्वाची माहिती दिली. या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ८१ जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी ११ जणांच्या रक्तनमुन्यात अल्कोहोल आढळले आहे, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले. ८ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. त्याच्या आदल्या दिवशी ७ एप्रिल रोजी गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी बैठक झाली होती. या बैठकीला २० ते २५ जण उपस्थित होते, असेही तपासातून पुढे आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील सदावर्ते यांच्या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी पत्नी जयश्री पाटील यांनी पोलीस संरक्षण सोडले असून आता पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गुणरत्न सदावर्ते यांना ९ तारखेला न्यायालयात हजर केल्यापासून जयश्री पाटील यांनी पोलिसांचे संरक्षण सोडले आहे. सदावर्तेना कोर्टात हजर केल्यावर त्या उपस्थित होत्या. मात्र तेव्हा त्या पोलीस संरक्षणाशिवाय आल्या होत्या. दरम्यान पवार यांच्या निवासस्थानी हल्ला करण्याचा कट गुणवंत सदावर्ते राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर आंदोलनाच्या आदल्या दिवशी शिजला. पवार यांच्या निवासस्थानी हल्ला करण्याचा सल्ला गुणवर्तेंच्या पत्नी जयश्री यांनी दिला, अशी माहिती मुंबई पोलिसांतर्फे गिरगाव न्यायालयात देण्यात आली. जयश्री पाटील यांना वॉण्टेड दाखवण्यात आले असून मुंबई पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जयश्री पाटील यांनी आपला मोबाईल फोन बंद केला असून त्या नॉटरिचेबल आहेत.
मच्छिमारांच्या घरांसाठी केंद्राने भूमिका घ्यावी - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्योत्पादनाचा…
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोलाचा सल्ला मुंबई : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे,…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…
पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे…
फ्रांन्सशी झाला ६४ हजार कोटी रुपयांचा करार नवी दिल्ली: भारत सरकार नौदलासाठी 26 राफेल मरीन…
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण आहे. हे संबंध आणिखी ताणले जाऊ…