यांच्यावर विश्वास ठेवणार कोण?

मुंबई : “जे कुठेच नाहीत, ज्यांनी आपला पक्ष दुसऱ्याला चालवण्यासाठी दिला आहे त्यांच्याबद्दल काय बोलणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. युवासेनेने महाराष्ट्रभर महागाईविरोधात थाळीनाद केला हे मनसेला दिसलं नाही. वसुली, कमिशन हा जो कांगावा सुरु आहे…. त्यांना वाटतं सारखं बोललं की ते लोकांना खरं वाटेल. मनसे आणि त्यांचे नेते लोकांसमोर उघडे पडले आहेत. लोकांना हे आपली भूमिका दर चार वर्षांनी बदलतात हे माहिती पडलं आहे. रंग बदलणे, झेंडे बदलणे सुरु आहे त्यामुळे कोणी यांच्यावर विश्वास ठेवणार नाही,” अशी टीका करत शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी संदीप देशपांडेंना उत्तर दिले.


यावर संदीप देशपांडे यांनी भाजपासोबत युती करुन निवडणुका लढल्या आणि नंतर पवारांच्या मांडीवर जाऊन बसले त्यांनी आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही, असे उत्तर दिले. थाळीनाद केला त्याचा परिणाम काय झाला अशी विचारणा त्यांनी केली. मनसे संपलेला पक्ष आहे सांगत त्यावर रोज बोलत राहतात असा टोलाही त्यांनी लगावला. तुमच्या यशवंत जाधवांचे ३१ फ्लॅट सील होतात, इतकी संपत्ती कुठून आली? अशी विचारणा त्यांनी केली.


यावर मनिषा कायंदे यांनी लाव रे तो व्हिडीओचं काय झालं? अशी आठवण करुन दिली. तुम्ही महाराष्ट्रविरोधी असून तुमचा पक्ष दुसऱ्यांना चालवायला दिला आहे. जाती-धर्मात तेढ निर्माण करत आहात आणि त्यातून मतं मिळवायची आहेत, अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली. उत्तर प्रदेशातील लोकांना आकर्षित करण्यासाठी हनुमान चालिसा म्हटली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.


यावर संदीप देशपांडे यांनी ही वायफळ बडबड असल्याची टीका केली. यांच्याकडे कोणत्याच प्रश्नाची उत्तरं नाहीत, अशी टीका यावेळी त्यांनी केली.

Comments
Add Comment

शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना