अतिदुर्गम सागपाना व रिठीपाडा गावात पोहोचले टँकरचे पाणी

Share

मनोज कामडी

जव्हार ग्रामीण : तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या वावर-वांगणी ग्रामपंचायतमधील सागपाना व रिठीपाडा भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. या भागात मार्च महिन्यापासून भीषण टंचाई निर्माण झाली असून येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी २ ते ३ किमी अंतरावरून मोटारसायकलवरून पाणी पिण्यासाठी घेऊन यावे लागते होते तसेच गावातील लोकांना खड्ड्यातील गढूळ पाणी वापरावे लागत असल्याची बातमी दैनिक प्रहार वृत्तपत्रातून प्रकाशित केली होती.

सदर बातमीची तातडीने दखल घेत तहसीलदार व गटविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने टँकरद्वारे दोन्ही गावांना सुरळीत पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे येथील आदिवासी महिलांची पाण्यासाठीची होणारी वणवण तात्पुरती थांबली आहे.

वावर-वांगणी ग्रामपंचायतीने सागपाना आणि रिठीपाडा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी २७ मार्चला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी तहसीलदार व पंचायत समिती जव्हार येथील पाणीपुरवठा विभागाकडे केली होती. तसेच ग्रामपंचायतमध्ये यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्या व पंचायत समिती सदस्या यांच्याकडेही ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यांनीही यासंदर्भात पाठपुरावा केला.

तसेच ‘जव्हार तालुक्यातील वावर ग्रामपंचायतील गावपाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाईचे संकट’ या मथळ्याखाली दैनिक प्रहार वृत्तपत्रामध्ये वृत्त प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली व त्यानंतर ग्रामपंचायतीने सागपाना व रिठीपाडा येथे टँकरद्वारे दररोज दोन टँकर पाणीपुरवठा सुरळीत सुरू केला.

 

त्यामुळे गेल्या मार्च महिन्यापासून पाण्यासाठी करावी लागणारी महिलांची व ग्रामस्थांची दोन ते तीन किमीवरील भटकंती थांबली असून ग्रामस्थांनी या संदर्भात ‘दैनिक प्रहार’चे आभार व्यक्त केलेत. तसेच पाणीटंचाई कायमस्वरूपी कशी दूर होईल यासाठी प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.

Recent Posts

गिरणी कामगारांच्या घरांच्या किमती कमी करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

एनटीसी गिरण्यांच्या जागेची शोध मोहीम सुरू करण्याचे म्हाडाला आदेश मुंबई (प्रतिनिधी) : गिरणी कामगारांच्या घरांच्या…

8 minutes ago

मुंबईतून कल्याणकरांचा प्रवास होणार सुखकर

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लवकरच होणार दाखल मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोची कामे वेगाने…

36 minutes ago

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तांवर हापूस आंबा झाला स्वस्त

पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तांवर मार्केटयार्डात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा उपलब्ध…

2 hours ago

‘हवा प्रदूषणात’ भारताची स्थिती चिंताजनक

प्रा. नंदकुमार काकिर्डे स्वित्झर्लंडस्थित आय क्यू एअर संस्थेने जागतिक पातळीवरील हवा प्रदूषणाचा व्यापक अहवाल प्रसिद्ध…

8 hours ago

मजबूत औद्योगिक धोरण हवे

उमेश कुलकर्णी अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी पावले उचलत आहेत त्यांनी…

8 hours ago

सोने आकाशात, डाळी जमिनीवर…

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरांचा वेलू अक्षरश: गगनावर गेला. वर्षभरातील किमतींची तुलना करता सोन्याने…

8 hours ago