महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी परीक्षेत वाढीव वेळ देणार

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले आहे. मागील दीड वर्ष शाळा, कॉलेज ऑनलाइन परीक्षा घेत होत्या. मग या वर्षीदेखील परीक्षा ऑनलाइन घ्या, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र कोरोना महामारी नियंत्रणात आल्यामुळे परीक्षा ऑफलाइन घेण्याचे निर्णय उच्च शिक्षण विभागाकडून घेण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत अडचणी येऊ नये म्हणून


मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. गेल्या वर्षभरांपासून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात आले असून कोरोना महामारी नियंत्रणात आल्यानंतर महाविद्यालय सुरु झाले. मात्र वर्षभर ऑनलाइन शिक्षण दिल्यानंतर ऑफलाइन परीक्षा कशाला असा सवाल उपस्थित करत राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं देखील झाली आहेत. बुधवारी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूंच्या झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यत आला आहे. ऑफलाइन परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रती तास १५ मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा जास्तीचा वेळ फक्त उन्हाळी (मार्च/ एप्रिल) २०२२ या परीक्षेपुरता असणार आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. आज झालेल्या कुलगुरूंच्या बैठकीत ऑफलाइन परीक्षांसाठी प्रती तास १५ मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये होणाऱ्या ऑफलाइन प्रथम सत्र उन्हाळी परीक्षेसाठी वेळ वाढविण्यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.


कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, म्हणून या काळात ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आणला. त्याप्रमाणे शिक्षण सुरूही झाले; परंतु ऑनलाइन शिक्षण सुरू असताना त्यामध्ये लिखाणाचा सराव होत नव्हता. गेल्या दीड वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या हातातील पेनाची जागा कम्प्युटर किंवा मोबाइलने घेतली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या

वंदे भारत एक्स्प्रेसला ६ तास उशीर

मुंबई : वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात

भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी

कफ परेड येथील चाळीत भीषण आग; एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, तीन जण जखमी

मुंबई: मुंबईतील कफ परेड परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण आगीच्या दुर्घटनेत एका १५ वर्षीय मुलाचा

नरकचतुर्दशी : अभ्यंगस्नान आणि नरकासुराचा वध!

मुंबई : आज सर्वत्र दिवाळीच्या उत्साहात नरकचतुर्दशी साजरी होत आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी

दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धीसह सौहार्द घेऊन येवो - उपमुख्यमंत्री पवार

मुंबई : दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि ऐक्याचा सण आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात नव्या आशा, नव्या संधी आणि